शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

"तुमचं सरकार बहुमताचं आहे, ते पाडलं जाईल याची एवढी भीती का बाळगता?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 15:21 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतीच शिवसेना नेते संजय राऊत यांना एक मुलाखत दिली. यात त्यांनी ऑपरेशन लोटस, असा उल्लेख करत काही भाष्यही केलं होतं. एवढंच नाही तर राऊतांनीही याच मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला होता.

ठळक मुद्देराज्यातील महाविकास आघाडीचं सरकारही पाडलं जाण्याची चर्चा निर्थक - मुनगंटीवारसरकार पाडणं एवढं सोपं असतं तर देशातल नरेंद्र मोदी सरकार विरोधकांनी केव्हाच पाडलं असतं - मुनगंटीवारसरकार पाडणं एवढं सोपं असतं तर देशातल नरेंद्र मोदी सरकार विरोधकांनी केव्हाच पाडलं असतं - मुनगंटीवार

नागपूर - मध्यप्रदेशनंतर आता राजस्थानात सत्ता संघर्ष सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकारही पाडलं जाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चेला काहीही अर्थ नाही. असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही, तर आघाडी सरकारच्या मनात सरकार पाडलं जाईल याची एवढी भीती का? सरकार पाडणं एवढं सोपं असतं तर देशातल नरेंद्र मोदी सरकार विरोधकांनी केव्हाच पाडलं असतं, असा टोलाही मुनगंटीवारांनी विरोधकांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतीच शिवसेना नेते संजय राऊत यांना एक मुलाखत दिली. यात त्यांनी ऑपरेशन लोटस, असा उल्लेख करत काही भाष्यही केलं होतं. एवढंच नाही तर राऊतांनीही याच मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला होता. आता हाच धागा धरत सुधीर मुनंगटीवार यांनी त्यांना टोला लगावला आहे. मुनगंटीवर म्हणाले, "आघाडी सरकारच्या मनात सरकार पडण्याची एवढी भीती का? असं कोणतंही सरकार पाडता येतं का? सरकार पाडणं एवढं सोपं असतं, तर देशातील सर्व विरोधकांनी एकत्र येत, 24 तास काहीही न खाता-पिता, बैठकांवर बैठका घेत, केंद्रातील मोदी सरकार आतापर्यंत पाडलं असतं. तसंच, तुमचं सरकार बहुमताचं आहे, ते पाडलं जाईल याची एवढी भीती का बाळगता?," असा प्रश्नही मुंगंटीवारांनी केला आहे.

...तर त्यांनी झोपेच्या गोळ्या घ्यावातयापूर्वी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही रविवारी महाविकास आघाडीला टोले लगावले. महाविकास आघाडीमधील काही लोकांना सरकार पडण्याची भीती वाटत आहे. यामुळे त्यांना झोपही लागत नाही. त्यांनी झोपेच्या गोळ्या घ्यावात. असं पाटील म्हणाले होते.

पवारांना पाटलांचं उत्तर -यापूर्वी संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले होते, गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे जे 105 आमदार निवडून आले, त्यात शिवसेनेचा मोठा वाटा होता. शिवसेनेची साथ नसती, तर भाजपच्या आमदारांचा आकडा 40 ते 50 पर्यंत खाली घसरला असता, यालाही चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

पावसात भिजण्यापासून सगळं करून झालं. त्यानंतरही राज्यातील निवडणुकीत कोणाच्या किती जागा आल्या हे सर्वांनी पाहिलं आहे. निवडणुकीत सर्व पक्षांनी स्वातंत्र निवडणूक लढवली असती तर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० आणि काँग्रेसचा फक्त १० जागाच आल्या असत्या. तसंच, कुणाची किती ताकद आहे, हे बघायचंच असेल तर पुन्हा सगळे वेगवेगळे लढू. चारही पक्ष वेगवेगळे लढू. कुणाच्या जागा जास्त येतात ते बघू, असं आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी पवारांना दिलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?

चीनला घेरण्यासाठी चार देश तयार; 90 फायटर जेट, 3000 सौनिकांसह US एअरक्राफ्ट कॅरिअर हिंदी महासागरात

15 जूनची रात्र : गलवानमध्ये भारतीय जवानांची 'बायोनेट' फाइटिंग, 'तो' बंधारा फुटल्यानंही मारले गेले चिनी सैनिक

पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, Twitterवरील फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे!

बुरखा फाटला!, सरकार PLA सोबत संबंध असणाऱ्या कंपन्यांविरोधात अॅक्शन घेण्याच्या तयारीत

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारSharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस