शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

'...तर भाजपा सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 09:18 IST

शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा हे २१व्या शतकातील सर्वात मोठे आश्चर्य आहे.

राज्यातील सत्तास्थापनेवरून शिवसेना-भाजपतील मतभेद प्रचंड विकोपाला गेल्याने 30 वर्षाची युती तोडून शिवसेनेने भिन्न विचारसारणीचे पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकाआघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र शिवसेनेने सत्तास्थापनेचा उद्याही प्रस्ताव दिला तर भाजपा शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास तयार असल्याचे मत भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. नांदेडच्या दौऱ्यावर असताना भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हे विधान केले आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणले की, शिवसेना हा पक्ष भाजपाचा नैसर्गिक मित्र आहे. शिवसेनेनं उद्याही प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाकडून अडचण नाही. तसेच शिवसेना पक्ष भाजपचा नैसर्गिक मित्र आहे. त्यामुळे सारे काही विसरून शिवसेनेने भाजपपुढे प्रस्ताव ठेवल्यास 'सुबह का भुला श्याम को लौट आया' असे समजून आम्ही त्याचा विचार करू असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.

शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा हे २१व्या शतकातील सर्वात मोठे आश्चर्य असल्याचे देखील सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच अशोक चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार फक्त भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मुस्लिमांच्या सांगण्यावरूनच ते सत्तेत गेले, असे सांगत शिवसेनेकडून काँग्रेसने लेखी हमी घेतल्याच्या चव्हाणांच्या दाव्यावरही मुनगंटीवार यांनी टोला लगावला आहे. मुंबईतील मातोश्री आज शक्तिहीन झालीय तर दिल्लीची मातोश्री शक्तिशाली झाली असल्याचे देखील सुधीर मुनगंटीवर यांनी यावेळी सांगितले.

18 जून 2019 रोजी विधीमंडळात सादर झालेल्या अर्थसंकल्पात चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या तीन नक्षलप्रभावित जिल्हयांमध्ये तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, यासाठी तीन वर्षात 500 कोटींचा आराखडा तयार करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला होता. दरवर्षी 175 कोटी रू. निधी या तीन जिल्ह्यासाठी आवंटीत करण्याची घोषणासुध्दा करण्यात आली होती. सदर योजना पुढे नेत या वर्षी यासाठी 175 कोटी रू. निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस