शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

ज्यांना जय श्रीराम म्हणायची लाज वाटते, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा; राम कदम यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 16:48 IST

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका (West Bengal Assembly Election 2021) जाहीर झाल्यानंतर आता पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. पश्चिम बंगलाच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बंगालमधील राजकारण तापले आहे. यातच शिवसेनेने (ShivSena) प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्यापेक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेकडून घेतल्या गेलेल्या या भूमिकेवर भाजप आमदार राम कदम यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

ठळक मुद्देराम कदम यांची शिवसेनेवर जोरदार टीकातर, पश्चिम बंगालमध्ये डिपॉझिट वाचवता आलं नसतं - राम कदमशिवसेनेचा पश्चिम बंगालमधील निवडणूक न लढवण्याचा निर्णय

मुंबई : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका (West Bengal Assembly Election 2021) जाहीर झाल्यानंतर आता पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. पश्चिम बंगलाच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बंगालमधील राजकारण तापले आहे. यातच शिवसेनेने (ShivSena) प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्यापेक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेकडून घेतल्या गेलेल्या या भूमिकेवर भाजप आमदार राम कदम यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. (bjp leader ram kadam slams shiv sena over west bengal assembly election 2021)

बिहारमध्ये शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत काही जागा लढवल्या होत्या. त्यामुळे पश्चिम बंगालमध्येही शिवसेना ताकद आजमावून पाहणार का, अशी चर्चा सुरू होती. मात्र, यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करून माहिती दिली. यामध्ये शिवसेना पश्चिम बंगालमध्ये निवडणुका लढवणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यानंतर भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर गंभीर टीका केली आहे. ''ज्यांना श्रीराम म्हणायची लाज वाटते, त्यांनाच शिवसेना पाठिंबा देत आहे'', अशी टीका राम कदम यांनी केली आहे. 

उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा

बिहारमध्ये डिपॉझिटही वाचवता आले नाही

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत शिवसेना का उतरत नाही?, अशी विचारणा राम कदम यांनी यावेळी केली आहे. बिहारमधील निवडणुकांमध्ये एकाही जागेचे डिपॉझिट शिवसेनेला वाचवता आले नाही. त्यातून धडा घेत शिवसेनेने बंगालमध्ये न लढण्याचा निर्णय घेतला, असा चिमटा राम कदम यांनी काढला. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असता, तरी तेथेही डिपॉझिट वाचवू शकले नसते, असा टोला राम कदम यांनी लगावला. 

काय म्हणाले संजय राऊत?

सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सगळे असा सामना आहे. सगळे एम, म्हणजेच मनी, मसल आणि मीडिया एकट्या ममतांविरोधात वापरले जात आहेत. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा आणि ममता दीदींसोबत ठामपणे उभं राहण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खऱ्या वाघीण आहेत, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Ram Kadamराम कदमShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMamata Banerjeeममता बॅनर्जी