शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

ज्यांना जय श्रीराम म्हणायची लाज वाटते, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा; राम कदम यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 16:48 IST

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका (West Bengal Assembly Election 2021) जाहीर झाल्यानंतर आता पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. पश्चिम बंगलाच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बंगालमधील राजकारण तापले आहे. यातच शिवसेनेने (ShivSena) प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्यापेक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेकडून घेतल्या गेलेल्या या भूमिकेवर भाजप आमदार राम कदम यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

ठळक मुद्देराम कदम यांची शिवसेनेवर जोरदार टीकातर, पश्चिम बंगालमध्ये डिपॉझिट वाचवता आलं नसतं - राम कदमशिवसेनेचा पश्चिम बंगालमधील निवडणूक न लढवण्याचा निर्णय

मुंबई : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका (West Bengal Assembly Election 2021) जाहीर झाल्यानंतर आता पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. पश्चिम बंगलाच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बंगालमधील राजकारण तापले आहे. यातच शिवसेनेने (ShivSena) प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्यापेक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेकडून घेतल्या गेलेल्या या भूमिकेवर भाजप आमदार राम कदम यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. (bjp leader ram kadam slams shiv sena over west bengal assembly election 2021)

बिहारमध्ये शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत काही जागा लढवल्या होत्या. त्यामुळे पश्चिम बंगालमध्येही शिवसेना ताकद आजमावून पाहणार का, अशी चर्चा सुरू होती. मात्र, यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करून माहिती दिली. यामध्ये शिवसेना पश्चिम बंगालमध्ये निवडणुका लढवणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यानंतर भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर गंभीर टीका केली आहे. ''ज्यांना श्रीराम म्हणायची लाज वाटते, त्यांनाच शिवसेना पाठिंबा देत आहे'', अशी टीका राम कदम यांनी केली आहे. 

उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा

बिहारमध्ये डिपॉझिटही वाचवता आले नाही

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत शिवसेना का उतरत नाही?, अशी विचारणा राम कदम यांनी यावेळी केली आहे. बिहारमधील निवडणुकांमध्ये एकाही जागेचे डिपॉझिट शिवसेनेला वाचवता आले नाही. त्यातून धडा घेत शिवसेनेने बंगालमध्ये न लढण्याचा निर्णय घेतला, असा चिमटा राम कदम यांनी काढला. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असता, तरी तेथेही डिपॉझिट वाचवू शकले नसते, असा टोला राम कदम यांनी लगावला. 

काय म्हणाले संजय राऊत?

सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सगळे असा सामना आहे. सगळे एम, म्हणजेच मनी, मसल आणि मीडिया एकट्या ममतांविरोधात वापरले जात आहेत. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा आणि ममता दीदींसोबत ठामपणे उभं राहण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खऱ्या वाघीण आहेत, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Ram Kadamराम कदमShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMamata Banerjeeममता बॅनर्जी