शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना जय श्रीराम म्हणायची लाज वाटते, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा; राम कदम यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 16:48 IST

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका (West Bengal Assembly Election 2021) जाहीर झाल्यानंतर आता पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. पश्चिम बंगलाच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बंगालमधील राजकारण तापले आहे. यातच शिवसेनेने (ShivSena) प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्यापेक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेकडून घेतल्या गेलेल्या या भूमिकेवर भाजप आमदार राम कदम यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

ठळक मुद्देराम कदम यांची शिवसेनेवर जोरदार टीकातर, पश्चिम बंगालमध्ये डिपॉझिट वाचवता आलं नसतं - राम कदमशिवसेनेचा पश्चिम बंगालमधील निवडणूक न लढवण्याचा निर्णय

मुंबई : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका (West Bengal Assembly Election 2021) जाहीर झाल्यानंतर आता पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. पश्चिम बंगलाच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बंगालमधील राजकारण तापले आहे. यातच शिवसेनेने (ShivSena) प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्यापेक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेकडून घेतल्या गेलेल्या या भूमिकेवर भाजप आमदार राम कदम यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. (bjp leader ram kadam slams shiv sena over west bengal assembly election 2021)

बिहारमध्ये शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत काही जागा लढवल्या होत्या. त्यामुळे पश्चिम बंगालमध्येही शिवसेना ताकद आजमावून पाहणार का, अशी चर्चा सुरू होती. मात्र, यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करून माहिती दिली. यामध्ये शिवसेना पश्चिम बंगालमध्ये निवडणुका लढवणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यानंतर भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर गंभीर टीका केली आहे. ''ज्यांना श्रीराम म्हणायची लाज वाटते, त्यांनाच शिवसेना पाठिंबा देत आहे'', अशी टीका राम कदम यांनी केली आहे. 

उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा

बिहारमध्ये डिपॉझिटही वाचवता आले नाही

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत शिवसेना का उतरत नाही?, अशी विचारणा राम कदम यांनी यावेळी केली आहे. बिहारमधील निवडणुकांमध्ये एकाही जागेचे डिपॉझिट शिवसेनेला वाचवता आले नाही. त्यातून धडा घेत शिवसेनेने बंगालमध्ये न लढण्याचा निर्णय घेतला, असा चिमटा राम कदम यांनी काढला. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असता, तरी तेथेही डिपॉझिट वाचवू शकले नसते, असा टोला राम कदम यांनी लगावला. 

काय म्हणाले संजय राऊत?

सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सगळे असा सामना आहे. सगळे एम, म्हणजेच मनी, मसल आणि मीडिया एकट्या ममतांविरोधात वापरले जात आहेत. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा आणि ममता दीदींसोबत ठामपणे उभं राहण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खऱ्या वाघीण आहेत, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Ram Kadamराम कदमShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMamata Banerjeeममता बॅनर्जी