शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

"शिवसेनेचे तुकडे होत आहेत, याकडे राऊतांनी बघावे, मुंबईची काळजी करु नये"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 18:09 IST

Pravin Darekar : मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची शिवसेनेशी भाजपने युती केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे.

मुंबई : शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर या बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपद मिळवले आहे. या सर्व घटनाक्रमामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत.

संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची शिवसेनेशी भाजपने युती केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. "शिवसेना मुळापासून संपविण्यासाठी संजय राऊत अशा प्रकारची व्यक्तव्य करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे नुकसान होत आहे. शिवसेनेचे तुकडे होत आहे, याकडे राऊतांनी बघावे, मुंबईची काळजी करु नये, मुंबईला कुणी हिरावून घेणार नाही, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

याचबरोबर, संजय राऊतांच्या आरोपांना गंभीर घेण्याची गरज नाही. संजय राऊतांचे विधानाला शून्य किंमत आहे. भाजप हा खूप मोठा पक्ष आहे. भाजपचा हात पकडून शिवसेना मोठी झाली आहे. बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले मुख्यमंत्री झाले आहेत, तसेच जे आमदार शिंदे गटात आले आहेत ते देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झाले आहेत. त्यामुळे बाळासाहेबांना नक्कीच समाधान लाभेल, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्री दिल्लीत जात नाही, एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे हायकमांड दिल्लीत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केली. तसेच, आम्ही लाल किल्ल्याला सलाम नाही मारत आम्ही रायगडाला सलाम करतो. आमचे हायकमंड दिल्ली नाही मातोश्री आहे. दिल्लीवाल्यांना मुंबई तोडायची आहे, म्हणून शिवसेना तोडली. यांना महाराष्ट्रचे तीन तुकडे करायचे आहेत, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ