शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

Sachin Vaze: “शिवसेनेनं आपलं पाप उघड होईल, म्हणून मिठी नदी साफ केली नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 16:58 IST

Sachin Vaze: भाजपकडून पुन्हा एकदा शिवसेना आणि ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देभाजपचा शिवसेनेवर निशाणामिठी नदी स्वच्छतेवरून लगावला टोलामिठी नदीत सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने NIA कडून शोधमोहीम

मुंबई : मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (mansukh hiren death case) आणि या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin vaze) यांना झालेली अटक यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून पुन्हा एकदा शिवसेना आणि ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली आहे. (bjp leader prasad lad criticized shiv sena over sachin vaze case)

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद झालेला मृत्यू या एकूणच प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून केला जात आहे. या तपासात NIA च्या हाती मोठे पुरावे लागले आहेत. सचिन वाझे यांनी मिठी नदीत काही पुरावे नष्ट करण्यासाठी टाकलेल्या काम्प्युटरचा सीपीयू, हार्डडिस्क, खोट्या नंबरप्लेटसह अनेक वस्तू सापडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेतलं, तेव्हाच सांगितलं होतं, अडचणीत याल: संजय राऊत

म्हणून मिठी नदी साफ केलेली नाही

इतके दिवस मिठी नदी स्वच्छ का केली जात नव्हती, याचा खुलासा आता झाला आहे. मिठी नदीत सचिन वाझे यांनी फेकलेले डीवीआर, सीपीयू सापडल्यानंतर शिवसेनेचे पाप जनतेसमोर उघड करू. शिवसेनेने आपले पाप उघड होईल, म्हणून मिठी नदी साफ केली नव्हती. यानंतर आता तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे. 

सचिन वाझेंमुळे अडचणी निर्माण होतील 

जेव्हा सचिन वाझेंना परत पोलीस सेवेत घेतलं होतं, तेव्हाच काही वरीष्ठ नेत्यांशी बोलताना मी म्हणालो होतो की, त्यांच्यामुळे पुढे अडचणी निर्माण होतील. काही वरिष्ठ आणि प्रमुख नेत्यांशी बोलताना म्हणालो होतो की, या अधिकाऱ्याचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत पाहाता आपल्यापुढे अडचणी निर्माण करू शकतील. हे बोललो, ते नेतेही सांगतील. कोणताही अधिकारी वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवत असते. ज्या पद्धतीने हे प्रकरण घडलं, त्यावर कदाचित कुणाचं नियंत्रण राहिलं नसेल. यातून अनेक मंत्र्यांनाही धडा मिळाला असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

कोरोनाचे थैमान! केंद्र आणि राज्य सरकारने मुंबईसाठी एकत्र यायला हवे; काँग्रेसचा सल्ला

दरम्यान, मिठी नदीत सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने NIAकडून शोधमोहीम राबवण्यात आली होती. सुमारे चार तास ही शोधमोहीम सुरू होती. मिठी नदीतून NIA ला एक लॅपटॉप, दोन कम्प्युटर, एक डीव्हीआर, एक हार्डडिस्क, एक प्रिंटर, दोन नंबर प्लेट्स सापडल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाMansukh Hirenमनसुख हिरणShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा