शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Sachin Vaze: “शिवसेनेनं आपलं पाप उघड होईल, म्हणून मिठी नदी साफ केली नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 16:58 IST

Sachin Vaze: भाजपकडून पुन्हा एकदा शिवसेना आणि ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देभाजपचा शिवसेनेवर निशाणामिठी नदी स्वच्छतेवरून लगावला टोलामिठी नदीत सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने NIA कडून शोधमोहीम

मुंबई : मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (mansukh hiren death case) आणि या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin vaze) यांना झालेली अटक यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून पुन्हा एकदा शिवसेना आणि ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली आहे. (bjp leader prasad lad criticized shiv sena over sachin vaze case)

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद झालेला मृत्यू या एकूणच प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून केला जात आहे. या तपासात NIA च्या हाती मोठे पुरावे लागले आहेत. सचिन वाझे यांनी मिठी नदीत काही पुरावे नष्ट करण्यासाठी टाकलेल्या काम्प्युटरचा सीपीयू, हार्डडिस्क, खोट्या नंबरप्लेटसह अनेक वस्तू सापडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेतलं, तेव्हाच सांगितलं होतं, अडचणीत याल: संजय राऊत

म्हणून मिठी नदी साफ केलेली नाही

इतके दिवस मिठी नदी स्वच्छ का केली जात नव्हती, याचा खुलासा आता झाला आहे. मिठी नदीत सचिन वाझे यांनी फेकलेले डीवीआर, सीपीयू सापडल्यानंतर शिवसेनेचे पाप जनतेसमोर उघड करू. शिवसेनेने आपले पाप उघड होईल, म्हणून मिठी नदी साफ केली नव्हती. यानंतर आता तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे. 

सचिन वाझेंमुळे अडचणी निर्माण होतील 

जेव्हा सचिन वाझेंना परत पोलीस सेवेत घेतलं होतं, तेव्हाच काही वरीष्ठ नेत्यांशी बोलताना मी म्हणालो होतो की, त्यांच्यामुळे पुढे अडचणी निर्माण होतील. काही वरिष्ठ आणि प्रमुख नेत्यांशी बोलताना म्हणालो होतो की, या अधिकाऱ्याचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत पाहाता आपल्यापुढे अडचणी निर्माण करू शकतील. हे बोललो, ते नेतेही सांगतील. कोणताही अधिकारी वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवत असते. ज्या पद्धतीने हे प्रकरण घडलं, त्यावर कदाचित कुणाचं नियंत्रण राहिलं नसेल. यातून अनेक मंत्र्यांनाही धडा मिळाला असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

कोरोनाचे थैमान! केंद्र आणि राज्य सरकारने मुंबईसाठी एकत्र यायला हवे; काँग्रेसचा सल्ला

दरम्यान, मिठी नदीत सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने NIAकडून शोधमोहीम राबवण्यात आली होती. सुमारे चार तास ही शोधमोहीम सुरू होती. मिठी नदीतून NIA ला एक लॅपटॉप, दोन कम्प्युटर, एक डीव्हीआर, एक हार्डडिस्क, एक प्रिंटर, दोन नंबर प्लेट्स सापडल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाMansukh Hirenमनसुख हिरणShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा