शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

पुरणपोळी अन् पत्रिका, त्यावर लिहिलं होतं साहेब...; पंकजा मुंडे आठवणीनं गहिवरल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 11:59 AM

मी २००४ पासून राजकारणात काम करते. संघर्षातून राजकारण करतेय. पडल्यानंतर जास्त मोठी झाली.

बीड - Pankaja Munde ( Marathi News ) गोपीनाथ गड हा पंकजा मुंडेंनी नव्हे तर तुम्ही केलाय. कारण त्या विचारांचे बीज माझ्या मेंदूत, हृदयात त्या पुरणपोळी आणि पत्रिकेने रोवलेला आहे म्हणून तो गड निर्माण केला. मी राजकारणात जिवंत राहणार का हे मला माहिती नव्हतं. मी या राज्यात गोपीनाथ मुंडेंच्या विचारांचे सरकार आणण्यासाठी सर्वात मोठे योगदान देईल हे मी सांगितलं होतं. त्यातून संघर्ष यात्रा काढली. त्याचवेळी गोपीनाथ गड निर्माण केला अशा आठवणी पंकजा मुंडे यांनी लोकांना सांगताना गहिवरल्या. 

बीडमधील एका कार्यक्रमात पंकजा मुंडे म्हणाल्या की, वटसावित्री पोर्णिमेचा तो दिवस होता, त्यादिवशी मी जिथे साहेबांच्या चितेला अग्नी दिला तिथे पाहिले तेव्हा कुणीतरी पुरणपोळी आणि एक पत्रिका ठेवली होती. त्यावर साहेब असा उल्लेख होता. मला हे पाहून गहिवरून आले. त्या माणसाने साहेबांच्या अग्नी दिला तिथे पत्रिका ठेवली. जर साहेबांना कुठे जागा नाही दिली तर ही लोक मरतील हा विचार माझ्या मनात आला. त्यामुळे मी गोपीनाथ गड उभारणार हा निश्चय केला असं त्यांनी म्हटलं. 

तसेच गोपीनाथ गड हा कुठला धार्मिक गड नाही, महंताचा गड नाही. कुठल्या संतांचा गड नाहीच नाही. तर एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या, सामान्य माणसासाठी लढणाऱ्या सामान्य माणसांचा तो गड आहे. तो गड ऊर्जेचा, प्रेरणेचा, आशेचा आहे. गोपीनाथ गड हा मी निर्माण केला नाही. तर तो तुम्ही केलाय. मुंडेसाहेब ३ जूनला गेले. १२ डिसेंबरला त्या गडाचे भूमिपूजन केले त्यानंतर पुढच्या ३ जूनला अमित शाहांच्या हस्ते त्या गडाचं भूमिपूजन केले. ६ महिन्यात गड उभा केला. याठिकाणी हजारो लोक कार्यक्रमाला येतात. सगळ्या विचारांचे सगळ्या पक्षांचे नेते तिथे आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार हे नेते वगळता इतर सर्वच नेते आलेत असंही पंकजा मुंडेंनी सांगितले. 

दरम्यान, गोपीनाथ गड निर्माण करून तो लोकांना समर्पित केले, गडाच्या आधारे राजकारण करत नाही. गडावर हक्क सांगितला नाही. राजकारणातसुद्धा माणसाला परिपक्व बनावं लागते. मी २००४ पासून राजकारणात काम करते. संघर्षातून राजकारण करतेय. पडल्यानंतर जास्त मोठी झाली. मी पालकमंत्री असताना अनेकांना निधी दिला त्यामुळे माझी आठवणही आजही अनेकांना होतेय. ज्यांना कष्ट करता येतात, विचारांचे राजकारण होते. आता इतके दिवस वनवास भोगलाय, आता कलियुगात पाच वर्षच वनवास असावा. कुठेही गेले तरी माझ्यासोबत राहणार का? आपली स्वाभिमानाची लढाई कधीच सोडायची नाही. कलियुगाच्या राजकीय युद्धात माझ्या पाठिशी आशिवार्दाचे बळ उभं करा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी जनतेला केले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेGopinath Mundeगोपीनाथ मुंडेBJPभाजपा