शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
3
बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही
4
Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव
5
तब्येत बरी नसतानाही IPL मॅचनंतर शाहरुखची 'ती' कृती जिंकतेय चाहत्यांचं मन; Video व्हायरल
6
Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?
7
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी
8
"मला iPhone घेण्याची ऐपत नाही..."; लेकीनं बापाला इतकं सुनावलं, रस्त्यावरच गुडघे टेकले
9
प्रज्वल रेवण्णांच्या अटकेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पीएम मोदींना पत्र लिहिलं; केली मोठी मागणी
10
षडयंत्र, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे...; बांग्लादेशी खासदाराच्या मृत्यूचं गूढ कायम
11
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
12
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला न विसरता करा पिंपळाची पूजा; जाणून घ्या कारण!
13
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
14
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
15
Success Story: वडील शेतकरी, आई चालवायची अंगणवाडी केंद्र; मुलानं उभं केलं ₹९७३ कोटींचं साम्राज्य
16
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
17
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या विचारातून परिस्थितीचा सामना करायला शिका!
18
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
19
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
20
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

"भास्कर जाधव चिपळुणात नाक्या नाक्यावर रोज शिवसेनेला शिव्या देत होते"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 8:28 PM

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप आणि नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, यावर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पलटवार केला आहे.

ठळक मुद्देनिलेश राणे यांची भास्कर जाधव यांच्यावर टीकाराष्ट्रवादीतून निवडून यायची खात्री नव्हती म्हणून शिवसेनेत उडी मारली - राणेमुलाला जि. प. अध्यक्ष केला म्हणून शिवसेनेचा पुळका - राणे

मुंबई : राज्यातील एकूणच घडामोडींवरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. भाजप (BJP) आणि अन्य पक्ष ठाकरे सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. अशातच माजी मंत्री आणि शिवसेनेचे कोकणातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप आणि नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, यावर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजपचे महाराष्ट्र सचिव निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पलटवार केला आहे. भास्कर जाधव चिपळुणात नाक्या नाक्यावर रोज शिवसेनेला शिव्या देत होते, असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे. (bjp leader nilesh rane slams bhaskar jadhav over various issues)

भास्कर जाधव यांच्या चिरंजीवांना रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यात आला आहे. भास्कर जाधव यांनी शिवबंधन बांधले असले, तरी त्यांचे पुत्र विक्रांत जाधव अजूनही राष्ट्रवादीत आहेत. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या भास्कर जाधवांची नाराजी दूर करण्यासाठी चिरंजीवांना संधी देण्यात येत आहे, असे सांगितले जात आहे. यावेळी भास्कर जाधव यांनी भाजप आणि नारायण राणे यांच्यावर पलटवार केला. या पलटवाराला निलेश राणे यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे. 

सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार

काय म्हणाले निलेश राणे?

भास्कर जाधव विसरले ते राष्ट्रवादीत वाढले, सगळी पदे मिळून सुद्धा परत राष्ट्रवादीतून निवडून यायची खात्री नव्हती म्हणून २ वर्षा पूर्वी शिवसेनेत उडी मारली. आज मुलाला जि. प. अध्यक्ष केला म्हणून शिवसेनेचा पुळका आला नाही तर चिपळुणात नाक्या नाक्यावर रोज शिवसेनेला शिव्या देत होता, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला आहे. 

रश्मी शुक्लांना अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती; परमबीर सिंगांचा पुन्हा मोठा दावा

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत हे अनेकांना पचत नाहीए

काही लोकांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहिली होती. मुख्यमंत्री होता न आल्यानं त्यांनी टाहो फोडला होता. पण, त्यानंतर देखील ते मुख्यमंत्री झाले नाहीत. सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत हे अनेकांच्या पचनी पडत नसल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आम्हीही देत नाही आणि तुम्ही देखील देऊ नका, असा टोला भास्कर जाधव यांनी नारायण राणेंना लगावला. 

महाराष्ट्र सरकार वाझे गॅंगला वाचवण्याचं काम करतंय; राम कदम यांचा घणाघाती आरोप 

मुख्यमंत्री झाला नाही, हीच भाजपला सल

महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही. हीच भाजपच्या मनात सल आहे. राज्यात भाजप सरकार आले नाही, तर २०२४ मध्ये केंद्रात भाजप सरकार येणार नाही, याची भाजपला कल्पना आहे. हीच भाजपची दुखरी नस असून, याच कारणास्तव भाजपकडून वारंवार राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNilesh Raneनिलेश राणे Bhaskar Jadhavभास्कर जाधवShiv SenaशिवसेनाBJPभाजपा