महाराष्ट्र सरकार वाझे गॅंगला वाचवण्याचं काम करतंय; राम कदम यांचा घणाघाती आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 05:25 PM2021-03-22T17:25:13+5:302021-03-22T17:30:01+5:30

Param Bir Singh Letter: महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

bjp leader ram kadam slams on thackeray govt over param bir singh letter | महाराष्ट्र सरकार वाझे गॅंगला वाचवण्याचं काम करतंय; राम कदम यांचा घणाघाती आरोप 

महाराष्ट्र सरकार वाझे गॅंगला वाचवण्याचं काम करतंय; राम कदम यांचा घणाघाती आरोप 

Next
ठळक मुद्देराम कदम यांची ठाकरे सरकारवर टीकाराज्यातील जनतेला मुर्ख समजू नये - राम कदमवाझे गँगला वाचवण्यासाठी खोटं बोलण्याच्या सर्व परिसीमा पार केल्या - राम कदम

मुंबई : सचिन वाझे प्रकरणानंतर (Sachin Vaze Case) मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून झालेल्या उचलबांगडीनंतर परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रावरून महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. अशातच भाजप नेते राम कदम यांनीही टीका करत वाझे गँगला वाचवण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचे म्हटले आहे. (bjp leader ram kadam slams on thackeray govt over param bir singh letter)

महाराष्ट्र सरकार वाझे गॅंगला वाचवण्याचे काम करत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले. वाझे गँगला वाचवण्यासाठी खोटं बोलण्याच्या सर्व परिसीमा पार केल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेला ठाकरे सरकारने मुर्ख समजू नये, अशी टीका राम कदम यांनी केली.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; चार पक्षांची राज्यपालांकडे आग्रही मागणी

पवारांना किती सारवासारव करायला भाग पाडणार

खरंच... स्वतःची चामडी वाचवण्यासाठी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला या वयात आणखी किती सारवासारव करायला भाग पाडणार आहात?, थोडा त्यांच्या ज्येष्ठतेचा तरी विचार करा. अनिल देशमुखांना वाचवायचचं, असा निर्णय राष्ट्रवादीनं घेतलेला दिसतोय. १५ फेब्रुवारीला देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली होती, क्वारंटाईन काळात घेता येते? कितीही झाकलं तरी सत्य लपणार नाही. ये पब्लिक है, ये सब जानती है, असे सांगत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणी जोरदार टीका केली. 

राज ठाकरे यांनी केलेली मागणी योग्यच; देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा

राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे

पोलिसांचा वापर होत आहे आणि पोलीस आम्हाला राजकीय व्यवस्थेने आदेश दिल्याचे सांगत आहेत. आतापर्यंत १०० कोटी जमा करण्याचे पत्र समोर आले आहे. त्यामधून २,३०० कोटी रुपये जमा करण्यास आल्याचे दिसत आहे. हे पैसे कोणासाठी जमा कऱण्यात आले? यामध्ये एक मंत्री असेल वाटत नाही. पक्षीय स्तरावर हा निर्णय झाला आहे की, मंत्रिमंडळ स्तरावर याचा शोध घेतला पाहिजे. शोध घ्यायचा असला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

Web Title: bjp leader ram kadam slams on thackeray govt over param bir singh letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.