शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

Maharashtra Politics: “राहुल गांधींना अजिबात इतिहास माहिती नाही, ते काँग्रेसचे लोढणे”; सावरकर मुद्द्यावरुन टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 10:57 IST

Maharashtra News: स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या क्रांतिसूर्याचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना देश कधीही माफ करणार नाही, अशी टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. विरोधकांकडून राहुल गांधींवर सडकून टीका केली जात आहे. या प्रकरणी भाजप, शिंदे गट आणि मनसे आक्रमक झाली आहे. यातच आणखी एका नेत्याने राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींना अजिबात इतिहास माहिती नाही. राहुल गांधी काँग्रेसचे लोढणे असल्याची बोचरी टीका करण्यात आली आहे. 

भाजप आमदार योगेश सागर यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यासारखे ते वक्तव्यच नाही. राहुल गांधींना या देशाचा इतिहास माहिती नाही. राहुल गांधींना या देशाचा भूगोल माहिती नाही. देशाच्या स्वातंत्र्याची जी मोठी चळवळ उभी राहिली, त्याबाबत राहुल गांधींचा थोडाही अभ्यास नाही. राहुल गांधी शंभर टक्के पप्पू आहे. राहुल गांधी काँग्रेसची लायबिलिटी आहे. म्हणूनच राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या क्रांतिसूर्याचा वारंवार अपमान करतात. यासाठी केवळ महाराष्ट्र नाही, तर देशातील जनता राहुल गांधींना गांभिर्याने घेत नाहीत आणि अशा विधानांसाठी त्यांना माफही करणार नाही, या शब्दांत भाजप नेते सागर यांनी राहुल गांधींवर घणाघाती टीका केली. 

महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते

या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्याचे काहीच कारण नव्हते. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असे नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. राहुल गांधी यांनी अशा प्रकारचे विधान करण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते हे लक्षात घ्या, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राहुल गांधींनी देशाचा अपमान केला आहे. सावरकरांबद्दल त्यांचे हे वक्तव्य कुणीही सहन करू शकणार नाही. भाजप याचा तीव्र निषेध करणार आहे. त्यांनी या वक्तव्याबद्दल देशाची माफी मागितली पाहिजे, राहुल गांधींवर पोलिसांनीही गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Yogesh Sagarयोगेश सागरRahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर