शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

Maharashtra Politics: “राहुल गांधींना अजिबात इतिहास माहिती नाही, ते काँग्रेसचे लोढणे”; सावरकर मुद्द्यावरुन टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 10:57 IST

Maharashtra News: स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या क्रांतिसूर्याचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना देश कधीही माफ करणार नाही, अशी टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. विरोधकांकडून राहुल गांधींवर सडकून टीका केली जात आहे. या प्रकरणी भाजप, शिंदे गट आणि मनसे आक्रमक झाली आहे. यातच आणखी एका नेत्याने राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींना अजिबात इतिहास माहिती नाही. राहुल गांधी काँग्रेसचे लोढणे असल्याची बोचरी टीका करण्यात आली आहे. 

भाजप आमदार योगेश सागर यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यासारखे ते वक्तव्यच नाही. राहुल गांधींना या देशाचा इतिहास माहिती नाही. राहुल गांधींना या देशाचा भूगोल माहिती नाही. देशाच्या स्वातंत्र्याची जी मोठी चळवळ उभी राहिली, त्याबाबत राहुल गांधींचा थोडाही अभ्यास नाही. राहुल गांधी शंभर टक्के पप्पू आहे. राहुल गांधी काँग्रेसची लायबिलिटी आहे. म्हणूनच राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या क्रांतिसूर्याचा वारंवार अपमान करतात. यासाठी केवळ महाराष्ट्र नाही, तर देशातील जनता राहुल गांधींना गांभिर्याने घेत नाहीत आणि अशा विधानांसाठी त्यांना माफही करणार नाही, या शब्दांत भाजप नेते सागर यांनी राहुल गांधींवर घणाघाती टीका केली. 

महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते

या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्याचे काहीच कारण नव्हते. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असे नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. राहुल गांधी यांनी अशा प्रकारचे विधान करण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते हे लक्षात घ्या, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राहुल गांधींनी देशाचा अपमान केला आहे. सावरकरांबद्दल त्यांचे हे वक्तव्य कुणीही सहन करू शकणार नाही. भाजप याचा तीव्र निषेध करणार आहे. त्यांनी या वक्तव्याबद्दल देशाची माफी मागितली पाहिजे, राहुल गांधींवर पोलिसांनीही गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Yogesh Sagarयोगेश सागरRahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर