शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
3
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
4
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
5
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
6
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
7
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
8
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
9
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
10
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
11
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

बाळासाहेबांनी 'तसा' शब्द घेतला असेल, असं वाटत नाही; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 22:04 IST

फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाचा आग्रह लावून धरला. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असा शब्द बाळासाहेबांना दिल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यावेळी वारंवार म्हटलं होतं. त्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत स्थापन केलेलं सरकार म्हणजे जनादेशाची प्रतारणा असल्याची टीका त्यांनी केली. मला उद्धव ठाकरेंचं अतिशय आश्चर्य वाटतं. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असं वचन बाळासाहेबांना दिल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात. पण काँग्रेसच्या पाठिंब्यानं शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असं वचन बाळासाहेबांनी उद्धव यांच्याकडून घेतलं असेल, असं मला वाटत नाही, असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला. बाळासाहेबांनी काँग्रेसवर कायम टीका केली होती. त्यांनी काँग्रेसला टोकाचा विरोध केला होता. मात्र आता उद्धव ठाकरे त्याच काँग्रेससोबत गेले आहेत, असंदेखील फडणवीस लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. शिवसेना आमच्यासोबत असताना त्यांचा मान राखला जायचा. मात्र आता परिस्थिती वेगळी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. 'शिवसेना आमच्यासोबत असताना मातोश्रीवरुन आदेश द्यायचे आणि आम्ही ते आदेश पाळायचो. मात्र आता त्यांना सिल्व्हर ओक, ट्रायडंटवर जावं लागतं,' असा चिमटा फडणवीसांनी काढला. आता सामनाचे अग्रलेख बघा. त्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. त्यांना काँग्रेसला खूश ठेवायचं आहे. याशिवाय जुन्या मतदारांनादेखील सांभाळायचं आहे. नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावर त्यांनी 'नरो वा कुंजरो वा' अशी भूमिका घेतली आहे. तीन पक्षांचं सरकार फार काळ चालत नाही, हा इतिहास आहे, असं फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस