शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

…त्यामुळे शरद पवारांनी 'डबलगेम' केला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 18:35 IST

मी माझ्या पक्षासोबत बोलणी केली. उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला होता त्यामुळे त्यांना सत्तास्थापनेसाठी यश येणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न केले असं फडणवीस म्हणाले.

मुंबई  - २०१९ च्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी आमचा विश्वासघात केला. बहुमत आल्यानंतर संख्याबळ पाहून उद्धव ठाकरेंनी विरोधकांसोबत मिळून सरकार बनवले. त्यांनी काँग्रेससोबत बोलणी सुरू केली. आमच्या १० जागा जास्त आल्या असत्या तर हे घडले नसते. बहुमत मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत बोलणे टाळले, फोन घेतले नाही. त्यानंतर आमच्या लक्षात आले. तेव्हा राष्ट्रवादीकडून आम्हाला संपर्क झाला. ३ पक्षांचे सरकार बनू शकत नाही. त्यामुळे स्थिर सरकार येण्यासाठी भाजपा-राष्ट्रवादीने एकत्र आले पाहिजे असं म्हटलं असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी माझ्या पक्षासोबत बोलणी केली. उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला होता त्यामुळे त्यांना सत्तास्थापनेसाठी यश येणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न केले. आम्ही बैठक शरद पवारांसोबत घेतली. शरद पवारांनीही स्थिर सरकारसाठी भाजपा-राष्ट्रवादी एकत्र यावं ही गोष्ट मान्य केली. शरद पवारांनी ही जबाबदारी अजित पवार आणि माझ्यावर दिली. कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार, पालकमंत्री कोण असतील ही यादी आम्ही बनवली. त्यानंतर शरद पवारांनी माघार घेतली. तेव्हा अजित पवारांनी इतक्या पुढे जाऊन पुन्हा माघारी फिरणार नाही अशी भूमिका घेतली मग आम्ही शपथविधी सोहळा घेतला. परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आम्ही बहुमत चाचणी घेतली असती तर आमदार अपात्र ठरले असते. कारण अजित पवारांसोबत आमदार होते पण पक्ष नव्हता. त्यामुळे अजित पवार पुन्हा परतले. उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला आणि शरद पवारांनी डबल गेम खेळला असा आरोप त्यांनी केला. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शरद पवारांना किंगमेकर अन् सत्ता हाती हवी असावी

माझ्या राजकीय माहितीनुसार, निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात डील झाली होती. भाजपाला जर १३० हून अधिक जागा आल्या तर ते तुम्हाला विचारणार नाही असं पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितले. त्यामुळे ज्याठिकाणी भाजपाचे उमेदवार असतील तिथे तुम्ही आम्हाला मदत करा. तुमच्या जागेवर आम्ही तुम्हाला मदत करू. त्यामुळे दोघांना चांगल्या जागा येतील. त्यातून तुमचीही बार्गिनिंग पॉवर वाढेल असा समझौता झाला. निकालानंतर संख्या पाहून उद्धव ठाकरेंनी पुन्हा शरद पवारांशी संपर्क साधला. पण पवारांच्या पक्षातील लोकांना स्थिर सरकार हवे होते. त्यामुळे शरद पवारांनी आम्हाला संपर्क साधला. जर आमचे सरकार बनले तर तुलनात्मक एक मजबूत मुख्यमंत्री बनतील. त्यानंतर नड्डा, अमित शाह, मोदी हेदेखील असतील. पण महाविकास आघाडी सरकार बनले तर किंगमेकरही मीच असेन आणि सत्ताही माझ्या हाती राहील असं पवारांना वाटले असावे असं मला वाटतं असंही फडणवीस यांनी म्हटलं.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे