शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

…त्यामुळे शरद पवारांनी 'डबलगेम' केला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 18:35 IST

मी माझ्या पक्षासोबत बोलणी केली. उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला होता त्यामुळे त्यांना सत्तास्थापनेसाठी यश येणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न केले असं फडणवीस म्हणाले.

मुंबई  - २०१९ च्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी आमचा विश्वासघात केला. बहुमत आल्यानंतर संख्याबळ पाहून उद्धव ठाकरेंनी विरोधकांसोबत मिळून सरकार बनवले. त्यांनी काँग्रेससोबत बोलणी सुरू केली. आमच्या १० जागा जास्त आल्या असत्या तर हे घडले नसते. बहुमत मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत बोलणे टाळले, फोन घेतले नाही. त्यानंतर आमच्या लक्षात आले. तेव्हा राष्ट्रवादीकडून आम्हाला संपर्क झाला. ३ पक्षांचे सरकार बनू शकत नाही. त्यामुळे स्थिर सरकार येण्यासाठी भाजपा-राष्ट्रवादीने एकत्र आले पाहिजे असं म्हटलं असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी माझ्या पक्षासोबत बोलणी केली. उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला होता त्यामुळे त्यांना सत्तास्थापनेसाठी यश येणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न केले. आम्ही बैठक शरद पवारांसोबत घेतली. शरद पवारांनीही स्थिर सरकारसाठी भाजपा-राष्ट्रवादी एकत्र यावं ही गोष्ट मान्य केली. शरद पवारांनी ही जबाबदारी अजित पवार आणि माझ्यावर दिली. कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार, पालकमंत्री कोण असतील ही यादी आम्ही बनवली. त्यानंतर शरद पवारांनी माघार घेतली. तेव्हा अजित पवारांनी इतक्या पुढे जाऊन पुन्हा माघारी फिरणार नाही अशी भूमिका घेतली मग आम्ही शपथविधी सोहळा घेतला. परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आम्ही बहुमत चाचणी घेतली असती तर आमदार अपात्र ठरले असते. कारण अजित पवारांसोबत आमदार होते पण पक्ष नव्हता. त्यामुळे अजित पवार पुन्हा परतले. उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला आणि शरद पवारांनी डबल गेम खेळला असा आरोप त्यांनी केला. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शरद पवारांना किंगमेकर अन् सत्ता हाती हवी असावी

माझ्या राजकीय माहितीनुसार, निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात डील झाली होती. भाजपाला जर १३० हून अधिक जागा आल्या तर ते तुम्हाला विचारणार नाही असं पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितले. त्यामुळे ज्याठिकाणी भाजपाचे उमेदवार असतील तिथे तुम्ही आम्हाला मदत करा. तुमच्या जागेवर आम्ही तुम्हाला मदत करू. त्यामुळे दोघांना चांगल्या जागा येतील. त्यातून तुमचीही बार्गिनिंग पॉवर वाढेल असा समझौता झाला. निकालानंतर संख्या पाहून उद्धव ठाकरेंनी पुन्हा शरद पवारांशी संपर्क साधला. पण पवारांच्या पक्षातील लोकांना स्थिर सरकार हवे होते. त्यामुळे शरद पवारांनी आम्हाला संपर्क साधला. जर आमचे सरकार बनले तर तुलनात्मक एक मजबूत मुख्यमंत्री बनतील. त्यानंतर नड्डा, अमित शाह, मोदी हेदेखील असतील. पण महाविकास आघाडी सरकार बनले तर किंगमेकरही मीच असेन आणि सत्ताही माझ्या हाती राहील असं पवारांना वाटले असावे असं मला वाटतं असंही फडणवीस यांनी म्हटलं.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे