शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

'12 ऐवजी 13 तारखेच्या हिंसेवर जोर दिला जातोय, तो एक सुनियोजित कट'; देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 2:48 PM

'12 तारखेची हिंसेची घटना डिलीट करुन फक्त 13 तारखेच्या हिंसाचारावर अधिक जोर दिला जात आहे.'

अमरावती: काही दिवसांपूर्वी राज्यातील अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेनंतर हिंसाचार घडला. यानंतर आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावतीतील हिंसेचाराचा आढावा घेतला. हिंसाचारात नुकसान झालेल्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

आमरावतीच्या पालकमंत्री गप्पपत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'राज्यातील काही भागात 12 तारखेला हिंसाचार भडकला आणि त्याची रिअॅक्शन 13 तारखेला उमटली. पण 12 तारखेच्या घटनेबाबत कुणीच बोलत नाही, फक्त 13 तारखेच्या घटनेवर अधिक जोर दिला जातोय. 12 तारखेच्या घटनेवर का बोललं जात नाही? त्या हिंसेमागे कोण होतं? अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर त्यावर गप्प का आहेत? असे अनेक प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी विचारले.

कारवाई फक्त 13 तारखेच्या घटनेवरुनतु पुढे म्हणाले की, 'आम्ही कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही, पण 12 तारखेची घटना डिलीट करुन 13 तारखेच्या घटनेवर बोलत आहेत. सर्व कारवाई 13च्या घटनेवर सुरू आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर काहीच बोलत नाहीत. विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट करणे आम्हाला मान्य नाही, पण चुकीच्या घटनेवर भर दिला जातोय. 12 तारखेच्या घटनेवर सत्ताधारी काहीच बोलायला तया नाही, मतांचे ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न नाही ना? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

एकाच वेळी मोर्चे कसे निघाले ?फडणवीस पुढे म्हणाले, चुकीच्या माहितीच्या आधारे मोर्चे काढण्यात आले. कुराण शरीफ जाळण्यात येत असल्याचा व्हिडिओ दाखवण्यात आला, पण तो व्हिडीओ दिल्लीच्या कॅम्पमधील होता. त्याचवेळी पाकिस्तानातील फोटो व्हायरल झाला. मोठ्या हिंसाचारासाठी समाजाला भडकवण्यता आलं. एकाच वेळी विविध शहरातून एवढे मोठे मोर्चे कसे निघाले ? यावरुन हा सुनियोजित कट होता हे दिसून येतं, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाYashomati Thakurयशोमती ठाकूर