शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

Maharashtra Political Crisis: खाकस्पर्श...! आधी अनिल देशमुख, नंतर नवाब मलिक आणि आता संजय राऊत; पवारांना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 11:17 IST

Maharashtra Political Crisis: ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाईसंदर्भात भाजपने शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. पण का? जाणून घ्या...

मुंबई: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या चौकशीनंतर अपेक्षित सहकार्य न करण्याच्या कारणावरून ईडीने संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली. संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोप-प्रत्यारोपही होताना दिसत आहेत. मात्र, यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना भाजपकडून खोचक टोला लगावण्यात आला आहे. 

शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी अभूतपूर्व केलेल्या बंडानंतर पक्षाला घरघर लागल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे भगदाडाला ढिगळं जोडून पुन्हा एकदा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रचंड सक्रीय झाले आहेत. ठाकरे पिता-पुत्र ऑगस्टमध्ये राज्याच्या दौऱ्यावर असणार आहे. मात्र, बहुतांश बंडखोर आमदारांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत, शरद पवारांशी सलगी करत महाविकास आघाडी स्थापन केल्यामुळेच शिवसेनेत नाराजी होती, असंतोष होता, असे म्हटले. तसेच भाजपनेही शरद पवार आणि संजय राऊतांच्या दिलजमाईवर अनेकदा टीका केली आहे. यातच आता राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या ईडी कारवाईनंतर संजय राऊतांना अटक करण्यात आली आहे. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे. 

खाकस्पर्श...! 

संजय राऊतांवर झालेल्या ईडी कारवाईनंतर अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर एक इमेज शेअर केली आहे. यामध्ये तीन फोटो असून, पहिल्या फोटोत माजी गृहमंत्री अनिल देशमुख शरद पवारांचा हात धरून त्यांना कार्यक्रमास्थळी नेत असल्याचे दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक हे शरद पवारांसोबत उभे असल्याचे दिसत आहेत. तिसऱ्या फोटोत संजय राऊत आणि शरद पवार एकत्र असल्याचे दिसत आहेत. या फोटोला अतुल भातखळकर यांनी ‘खाकस्पर्श...’ असे कॅप्शन दिले आहे. म्हणजेच ज्यांनी ज्यांनी शरद पवारांचा हात धरला, त्यांचे पुढे काय झाले, हे अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्या उदाहरणांवरून सांगण्यात आल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, ईडी कार्यालयात घेऊन जाताना संजय राऊतांनी आपल्या अनोख्या शैलीत निवासस्थानाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांना अभिवादन केले. घरातून बाहेर पडल्यानंतर गळ्यातील भगवा गमछा काढून त्यांनी हवेत फिरवला. तसेच कारच्या सनरुफमधून बाहेर येऊन शिवसैनिक आणि समर्थकांना हात दाखवून आणि पुन्हा गळ्यातील भगवा गमछा फिरवून अभिवादन केले. यावरून भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. भगवा हा सोयीचा विषय नाही की तुम्ही अडचणीत असाल तेव्हा वापरावा, नसेल तेव्हा काढून ठेवावा, अशी टीका करताना, सत्ता स्थापन करताना भगवा नव्हता, अटक होताना भगवा गळ्यात कशाला?, अशी विचारणा अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAtul Bhatkhalkarअतुल भातखळकरSharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतAnil Deshmukhअनिल देशमुखnawab malikनवाब मलिकMahavikas Aghadiमहाविकास आघाडी