शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

Maharashtra Political Crisis: खाकस्पर्श...! आधी अनिल देशमुख, नंतर नवाब मलिक आणि आता संजय राऊत; पवारांना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 11:17 IST

Maharashtra Political Crisis: ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाईसंदर्भात भाजपने शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. पण का? जाणून घ्या...

मुंबई: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या चौकशीनंतर अपेक्षित सहकार्य न करण्याच्या कारणावरून ईडीने संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली. संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोप-प्रत्यारोपही होताना दिसत आहेत. मात्र, यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना भाजपकडून खोचक टोला लगावण्यात आला आहे. 

शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी अभूतपूर्व केलेल्या बंडानंतर पक्षाला घरघर लागल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे भगदाडाला ढिगळं जोडून पुन्हा एकदा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रचंड सक्रीय झाले आहेत. ठाकरे पिता-पुत्र ऑगस्टमध्ये राज्याच्या दौऱ्यावर असणार आहे. मात्र, बहुतांश बंडखोर आमदारांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत, शरद पवारांशी सलगी करत महाविकास आघाडी स्थापन केल्यामुळेच शिवसेनेत नाराजी होती, असंतोष होता, असे म्हटले. तसेच भाजपनेही शरद पवार आणि संजय राऊतांच्या दिलजमाईवर अनेकदा टीका केली आहे. यातच आता राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या ईडी कारवाईनंतर संजय राऊतांना अटक करण्यात आली आहे. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे. 

खाकस्पर्श...! 

संजय राऊतांवर झालेल्या ईडी कारवाईनंतर अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर एक इमेज शेअर केली आहे. यामध्ये तीन फोटो असून, पहिल्या फोटोत माजी गृहमंत्री अनिल देशमुख शरद पवारांचा हात धरून त्यांना कार्यक्रमास्थळी नेत असल्याचे दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक हे शरद पवारांसोबत उभे असल्याचे दिसत आहेत. तिसऱ्या फोटोत संजय राऊत आणि शरद पवार एकत्र असल्याचे दिसत आहेत. या फोटोला अतुल भातखळकर यांनी ‘खाकस्पर्श...’ असे कॅप्शन दिले आहे. म्हणजेच ज्यांनी ज्यांनी शरद पवारांचा हात धरला, त्यांचे पुढे काय झाले, हे अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्या उदाहरणांवरून सांगण्यात आल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, ईडी कार्यालयात घेऊन जाताना संजय राऊतांनी आपल्या अनोख्या शैलीत निवासस्थानाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांना अभिवादन केले. घरातून बाहेर पडल्यानंतर गळ्यातील भगवा गमछा काढून त्यांनी हवेत फिरवला. तसेच कारच्या सनरुफमधून बाहेर येऊन शिवसैनिक आणि समर्थकांना हात दाखवून आणि पुन्हा गळ्यातील भगवा गमछा फिरवून अभिवादन केले. यावरून भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. भगवा हा सोयीचा विषय नाही की तुम्ही अडचणीत असाल तेव्हा वापरावा, नसेल तेव्हा काढून ठेवावा, अशी टीका करताना, सत्ता स्थापन करताना भगवा नव्हता, अटक होताना भगवा गळ्यात कशाला?, अशी विचारणा अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAtul Bhatkhalkarअतुल भातखळकरSharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतAnil Deshmukhअनिल देशमुखnawab malikनवाब मलिकMahavikas Aghadiमहाविकास आघाडी