शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

निवडणुकीपर्यंत आंदोलन वाढवत न्यायचं, हा मनोज जरांगेंचा प्रयत्न होता; आशिष देशमुख यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 16:25 IST

मनोज जरांगेंच्या एसआयटी चौकशीवर भाजपाचे नेते आशिष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून  सुरू झाले. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या एसआयटी चौकशीच्या मागणीवरुन सभागृहात गोंधळ सुरू झाला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे पाटील प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

मनोज जरांगेंच्या एसआयटी चौकशीवर भाजपाचे नेते आशिष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी सकारात्मक असताना तरीही मनोज जरांगे पाटील यांनी सहा महिने आंदोलन सुरू ठेवलं. अधिवेशनातून मराठा आरक्षण दिला असतानाही स्वतःच्या राजकीय महत्त्वकांक्षासाठी मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलनाचा उपयोग करत आहेत, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला. 

देवेंद्र फडणवीस यांच्यावर वाईट शब्दात त्यांनी उल्लेख केला. त्यांना शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांचे पाठबळ आहे, असा दावाही आशिष देशमुख यांनी केला. निवडणुकीपर्यंत आंदोलन वाढवत न्यायचं हा मनोज जरांगे यांचा प्रयत्न होता. एसआयटी चौकशीतून मनोज जरांगेंचे जे कोणी ऑपरेटर आहेत, ते समोर येईल, असंही आशिष देशमुख म्हणाले.

सगळ्यांची चौकशी होऊ द्या- मनोज जरांगे

एसआयटी चौकशीच्या आदेशावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्यांची चौकशी होऊ द्या. हे मला गुंतवण्यासाठी षडयंत्र रचत आहेत. आतापर्यंत त्यांना एवढा निष्ठावंत आंदोलक भेटला नाही, त्यामुळे हे षडयंत्र सुरू आहे. आमच्या आई-बहिणीच्या छाताडावर तुम्ही नाचले तेव्हा काही वाटलं नाही का?, मी नुसतं आई म्हटलं तर ते कसे लागले?, असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे. मराठ्यांनो आई बहिणीचे रक्षण करा. जातीसाठी उभे रहा. मी मरायला घाबरत नाही. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देणारच, असं मनोज जरांगेनी सांगितले. फक्त मुलगा म्हणून सर्वजण माझ्या पाठीमागे उभे रहा. समाजासाठी मरण येणं यासाठी खूप भाग्य लागते. मराठ्यांसाठी मी मरायला तयार आहे. जाळपोळ करणारी व्यक्ती आपली नाही. शांततेत आंदोलन करणारे आपले आहेत, असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच शरद पवार यांच्याशी कधी बोललो नाही. मी त्यांची मदत घेतली नाही. मी निष्ठा विकू शकत नाही. तुमच्या सत्तेसाठी मी मराठ्यांना का फसवू?, असं म्हणत मनोज जरांगेंनी सर्व आरोप फेटाळले आहेत. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAshish Deshmukhआशीष देशमुखMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार