शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

CoronaVirus: “घरबसल्या कारभार करणारे ठाकरे सरकार आभासी; राऊतसाहेब, डोळे उघडा...”

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 16:08 IST

CoronaVirus: देशाचे सरकार रामभरोसे आहे, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

ठळक मुद्देसंजय राऊत यांना भाजपकडून प्रत्युत्तरघरबसल्या कारभार करणारे ठाकरे सरकार आभासीकेशव उपाध्ये यांचा ट्विटरवरून पलटवार

मुंबई: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असली, तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाची चिंता कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. देशाचे सरकार रामभरोसे आहे, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. (bjp keshav upadhye replied sanjay raut over allegations on central govt)

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत, या देशात सरकार, प्रशासन, प्रधानमंत्री, आरोग्यमंत्री आहेत. पण ज्याप्रकारे मृत्यू होत आहेत. गंगा नदीत हजारोंच्या संख्येने मृतदेह मिळत आहेत, हाहाःकार माजला आहे ते पाहता देश रामभरोसे आहे, अशी टीका केली होती. याला आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे. 

धक्कादायक! उत्तर प्रदेशात ‘आऊट ऑफ डेट’ किटने १० हजार चाचण्या; बहुतांश रिपोर्ट निगेटिव्ह

घरबसल्या कारभार करणारे ठाकरे सरकार आभासी

राऊतजी, एवढे अगतिक का? घरबसल्या आभासी कारभार करणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारला असे आडून टोमणे मारणे त्यांच्यातील राजकारण्याला शोभत असले, तरी त्यांनी आपल्यातील पत्रकाराला जाब विचारला पाहिजे. राज्याचा आंधळा कारभार पाहण्याएवढा डोळसपणा त्यांच्यातील पत्रकाराने तरी दाखविला पाहिजे. राऊतसाहेब, डोळे उघडा… देशात कोरोनाचा हाहाःकार उडाला त्यात सर्वाधिक महाराष्ट्राचा वाटा आहे, हे कस विसरून चालेल? या कठिण परिस्थितीत जनतेला मदत करण्याऐवजी मंत्री अधिकाऱ्यावरून भांडत आहेत, पीआर कंत्राट दिली जात आहेत… किती यादी सांगू?, अशी विचारणा केशव उपाध्ये यांनी केली आहे. 

असे याआधी देशात कधीच झाले नव्हते

प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतही परिस्थिती वाईट आहे. तिथे सुद्धा ऑक्सिजनअभावी लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे पंतप्रधान, गृहमत्री, आरोग्यंत्री, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अहंकार आणि राजकारण विसरुन एकमेकांशी चर्चा करत एकत्र काम केले, तरच देशातील स्थिती सुधारू शकते. प्रधानमंत्री, केंद्र सरकार जागेवरच आहे, पण त्यांचे अस्तित्व दिसणे महत्त्वाचे आहे. अदृश्यपणे काम करून चालणार नाही. हा देश सध्या संकटाच्या काळात फक्त रामभरोसे पद्धतीने सुरू आहे. ज्या पद्धतीने गंगा, यमुनेत प्रेतांचा खच पडलेला आहे, मृतदेह वाहून येत किनाऱ्यावर लागली आहेत. त्यांच्यावर व्यवस्थित अंत्यसंस्कार ही करता येत नाही. हे असे याआधी देशात कधीच झाले नव्हते, असा घणाघात संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता.

गाझा सीमेवर इस्रायलने पाठवले सैन्य; आता जमिनीवरून युद्ध होण्याची शक्यता!

दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत ५४ हजार ५३५ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळाले आहे.  राज्यात आजपर्यंत एकूण ४६ लाख ५४ हजार ७३१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.३४% एवढे झाले आहे. तर गुरुवारी दिवसभरात ४२ हजार ५८२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ८५० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊतPoliticsराजकारण