शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा?; अमित शाहांच्या निर्णयाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 08:02 IST

येणाऱ्या निवडणुका महायुतीत लढवाव्यात ही शिवसेनेची भूमिका आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी महायुतीत न लढण्याचा परिणाम मतदारांवर होतो हे अनुभवलं आहे असं मत मंत्री संजय शिरसाट यांनी मांडले.

मुंबई - ३ महिन्यापूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानेमहायुतीत निवडणूक लढवून १३२ जागांपर्यंत मजल मारली आहे. मागील काही काळातला भाजपासाठी हा ऐतिहासिक विजय आहे. त्यामुळे नेत्यांचा उत्साह वाढलेला आहे. त्यातच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी असा सूर नेत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. अलीकडेच भाजपाच्या कोअर कमिटी बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती नको तर स्वबळावर निवडणूक लढवू असं मत व्यक्त केले आहे.

सूत्रांनुसार, राज्यातील नेत्यांच्या या मताला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सहमती असल्याचं बोललं जाते. २२ फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आहेत यावेळी फडणवीस आणि शाह यांच्यात यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या स्वबळाच्या योजनेमुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत खळबळ माजली आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवायला हवी, एकट्याने निवडणूक लढवल्यामुळे त्याचे नुकसान महायुतीत सहभागी सर्व पक्षाला होऊ शकते असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. 

शिंदे-फडणवीसांमध्ये संघर्ष?

महायुती सरकारच्या स्थापनेपासून अनेकदा एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या झळकल्या आहेत. सुरुवातीला मुख्यमंत्रि‍पदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याचं समोर आले. महायुतीत सर्वाधिक जागा जिंकून भाजपाने मुख्यमंत्रि‍पदावर दावा केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील हे नेते बोलू लागले. त्यानंतर सरकार स्थापनेत उपमुख्यमंत्रिपद घ्यायचे की नाही यावरूनही एकनाथ शिंदेंनी शेवटपर्यंत ठोस निर्णय घेतला नाही. आता सरकारमध्येही या दोन्ही नेत्यांमध्ये छुपा संघर्ष सुरू असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

दरम्यान, स्वबळावर लढायला आमची काही हरकत नाही. आम्ही कमजोर नाही. आम्ही आमचे लढू शकतो. मात्र आपापल्या वादविवाद होऊ नयेत. संघर्ष होऊ नये ही त्यामागची भूमिका आहे अन्यथा स्वबळावर प्रत्येकजण लढू शकतो. येणाऱ्या निवडणुका महायुतीत लढवाव्यात ही शिवसेनेची भूमिका आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी महायुतीत न लढण्याचा परिणाम मतदारांवर होतो हे अनुभवलं आहे. स्थानिक पातळीवर निर्णय व्हायला लागले तर युती होणार नाही असं चित्र दिसते. त्याचा भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. महायुतीत लढलो तर महायुती म्हणून मतदार सोबत राहतील असं शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी भूमिका मांडली आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुतीAmit Shahअमित शाह