शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

"शिवसेनेतील बंडामागे भाजपचाच हात, गुजरात, आसाममधील गोष्टींची आम्हाला माहिती" - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 07:35 IST

Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांच्या बंडामागे भाजपचाच हात आहे. शिंदे यांनी स्वत: राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. भाजप वगळता अन्य कोणता राष्ट्रीय पक्ष पाठिंबा देईल अशी शक्यता नाही

मुंबई : शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांच्या बंडामागे भाजपचाच हात आहे. शिंदे यांनी स्वत: राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. भाजप वगळता अन्य कोणता राष्ट्रीय पक्ष पाठिंबा देईल अशी शक्यता नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले.पवार यांनी यावेळी राष्ट्रीय पक्षांची यादीच सोबत आणली होती. शिवाय, या बंडामागे भाजप नेत्यांचा हात दिसत नसल्याचा अजित पवार यांचा दावाही शरद पवार यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला. महाराष्ट्रातील स्थितीची त्यांना कल्पना असली, तरी गुजरात आणि आसाममधील गोष्टींची आम्हाला जास्त माहिती असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.बंडाळीनंतर राज्यात उद्भवलेल्या राजकीय स्थितीसंदर्भात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाली. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, मंत्री, आमदार, खासदार या बैठकीला उपस्थित हाते. या बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. बंडामागे भाजपचा हात नसल्याचे विधान अजित पवार यांनी स्थिती पाहून केले असावे. ज्या लोकांनी आसाम व गुजरातमध्ये शिंदे यांची व्यवस्था केली, त्याची आम्हाला माहिती आहे. देशात सहा राष्ट्रीय पक्ष आहेत, त्यापैकी भाजप वगळता अन्य कोणीच शिंदेंना समर्थन देण्याची शक्यता नाही. अनेक बंडखोर आमदारांवर केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे किंवा होती. त्याचा परिणाम हा त्यांच्यावर झाला नसेल असे म्हणता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

बहुमतासाठी सभागृहात यावेच लागेल-सरकार टिकणार की नाही हे विधानसभेतील बहुमत ठरवेल. बंडखोर आमदारांना त्यांचे बहुमत सिद्ध करण्यासाठी इकडे यावेच लागेल. आसाममध्ये बसून ते करता येणार नाही. - जेव्हा हे आमदार विधिमंडळाच्या प्रांगणात दाखल होतील तेव्हा आता त्यांना गुजरात आणि आसाममध्ये साहाय्य करणारी मंडळी पोहोचू शकणार नाहीत, असा इशाराही पवार यांनी दिला.

या आमदारांना अडीच वर्ष सत्तेत असताना हिंदुत्वाचा मुद्दा अडचणीचा ठरला नव्हता. आज जेव्हा सरकार विरोधात जाण्याची संधी मिळाली तेव्हा हिंदुत्वाचे फक्त कारण पुढे केले जात आहे, त्यापेक्षा अधिक काही नाही.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सरकार स्थिर आहे...अशी स्थिती यापूर्वी मी महाराष्ट्रात अनेकदा बघितली आहे. या परिस्थितीवर मात करून हे सरकार व्यवस्थित सुरू राहील आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थिर आहे, हे संपूर्ण देशाला कळेल. सरकार अल्पमतात आहे की नाही, हे ठरवण्याचे ठिकाण विधानसभा आहे. विधानसभेत अविश्वास ठराव घेतल्यानंतर लक्षात येईल की हे सरकार बहुमतात आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले : परिणाम भोगावे लागतीलज्यावेळी छगन भुजबळ हे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले, तेव्हा त्यांच्यासोबत १२ ते १६ लोक आले होते. जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा एक सोडून इतर सर्वांचा पराभव झाला. हा पूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे आपल्या लोकांना काहीतरी सांगावे म्हणून निधीचा विषय काढला गेला. बाकी त्याला काही अर्थ नाही, असे पवार म्हणाले. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोना संकटावर मात करण्यासाठी आरोग्य खात्याने उत्तम कामगिरी केली. हे सर्व पाहिल्यानंतर महाविकास आघाडीचा हा प्रयोग फसला म्हणणे, याचा अर्थ राजकीय अज्ञान आहे. विधानसभेचे सभासद येथे आल्यानंतर, त्यांना ज्या पद्धतीने नेले ती सर्व वस्तुस्थिती लोकांना सांगतील, त्यानंतर बहुमत सिद्ध होईल, असेही पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा