शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
2
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
3
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
4
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
5
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
6
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
7
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
8
Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
9
ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
11
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 
12
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
13
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
14
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
15
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
16
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
17
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
18
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
19
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
20
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम

"शिवसेनेतील बंडामागे भाजपचाच हात, गुजरात, आसाममधील गोष्टींची आम्हाला माहिती" - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 07:35 IST

Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांच्या बंडामागे भाजपचाच हात आहे. शिंदे यांनी स्वत: राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. भाजप वगळता अन्य कोणता राष्ट्रीय पक्ष पाठिंबा देईल अशी शक्यता नाही

मुंबई : शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांच्या बंडामागे भाजपचाच हात आहे. शिंदे यांनी स्वत: राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. भाजप वगळता अन्य कोणता राष्ट्रीय पक्ष पाठिंबा देईल अशी शक्यता नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले.पवार यांनी यावेळी राष्ट्रीय पक्षांची यादीच सोबत आणली होती. शिवाय, या बंडामागे भाजप नेत्यांचा हात दिसत नसल्याचा अजित पवार यांचा दावाही शरद पवार यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला. महाराष्ट्रातील स्थितीची त्यांना कल्पना असली, तरी गुजरात आणि आसाममधील गोष्टींची आम्हाला जास्त माहिती असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.बंडाळीनंतर राज्यात उद्भवलेल्या राजकीय स्थितीसंदर्भात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाली. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, मंत्री, आमदार, खासदार या बैठकीला उपस्थित हाते. या बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. बंडामागे भाजपचा हात नसल्याचे विधान अजित पवार यांनी स्थिती पाहून केले असावे. ज्या लोकांनी आसाम व गुजरातमध्ये शिंदे यांची व्यवस्था केली, त्याची आम्हाला माहिती आहे. देशात सहा राष्ट्रीय पक्ष आहेत, त्यापैकी भाजप वगळता अन्य कोणीच शिंदेंना समर्थन देण्याची शक्यता नाही. अनेक बंडखोर आमदारांवर केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे किंवा होती. त्याचा परिणाम हा त्यांच्यावर झाला नसेल असे म्हणता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

बहुमतासाठी सभागृहात यावेच लागेल-सरकार टिकणार की नाही हे विधानसभेतील बहुमत ठरवेल. बंडखोर आमदारांना त्यांचे बहुमत सिद्ध करण्यासाठी इकडे यावेच लागेल. आसाममध्ये बसून ते करता येणार नाही. - जेव्हा हे आमदार विधिमंडळाच्या प्रांगणात दाखल होतील तेव्हा आता त्यांना गुजरात आणि आसाममध्ये साहाय्य करणारी मंडळी पोहोचू शकणार नाहीत, असा इशाराही पवार यांनी दिला.

या आमदारांना अडीच वर्ष सत्तेत असताना हिंदुत्वाचा मुद्दा अडचणीचा ठरला नव्हता. आज जेव्हा सरकार विरोधात जाण्याची संधी मिळाली तेव्हा हिंदुत्वाचे फक्त कारण पुढे केले जात आहे, त्यापेक्षा अधिक काही नाही.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सरकार स्थिर आहे...अशी स्थिती यापूर्वी मी महाराष्ट्रात अनेकदा बघितली आहे. या परिस्थितीवर मात करून हे सरकार व्यवस्थित सुरू राहील आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थिर आहे, हे संपूर्ण देशाला कळेल. सरकार अल्पमतात आहे की नाही, हे ठरवण्याचे ठिकाण विधानसभा आहे. विधानसभेत अविश्वास ठराव घेतल्यानंतर लक्षात येईल की हे सरकार बहुमतात आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले : परिणाम भोगावे लागतीलज्यावेळी छगन भुजबळ हे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले, तेव्हा त्यांच्यासोबत १२ ते १६ लोक आले होते. जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा एक सोडून इतर सर्वांचा पराभव झाला. हा पूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे आपल्या लोकांना काहीतरी सांगावे म्हणून निधीचा विषय काढला गेला. बाकी त्याला काही अर्थ नाही, असे पवार म्हणाले. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोना संकटावर मात करण्यासाठी आरोग्य खात्याने उत्तम कामगिरी केली. हे सर्व पाहिल्यानंतर महाविकास आघाडीचा हा प्रयोग फसला म्हणणे, याचा अर्थ राजकीय अज्ञान आहे. विधानसभेचे सभासद येथे आल्यानंतर, त्यांना ज्या पद्धतीने नेले ती सर्व वस्तुस्थिती लोकांना सांगतील, त्यानंतर बहुमत सिद्ध होईल, असेही पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा