शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

'भाजपाकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान'; अमित शाह यांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:25 IST

काल संसदेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरुन विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप विरोधकांनी केला हे. आज संसदेत आज काँग्रेससह विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. शाह यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी भाजपासह केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. 

अमित शाहांच्या बचावासाठी PM नरेंद्र मोदी पुढे आले; काँग्रेसला खडे बोल सुनावले

"संसदेत संविधानावरील चर्चेवेळी अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख तुच्छतेने आणि उर्मटपणे केला, शाह यांच्यात असे बोलण्याची हिंमत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने सांगितल्याशिवाय संसदेत अशाप्रकारचे वक्तव्य शाह यांनी शक्य नाही, यामुळे आता भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर केली. 

उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या काही वर्षापासून भाजपाचे नेते महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. तो अपमान आता सहनशीलतेच्या पलिकडे गेला आहे. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला होता. आम्ही त्यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. पण भाजपाने त्यांच्यावर कारवाई केली नाही, मधल्या काळात घाईघाईने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवतानासुद्धा त्या पुतळ्यात भ्रष्टाचार केला. तो पुतळा आठ महिन्यात पडला. त्यानंतर काय घडलं आपल्या सर्वांना कल्पना आहे. महाराष्ट्र हा जणू गांडूळांचा प्रदेश आहे असं भाजपाच्या वरिष्ठांना वाटू लागले आहे. उद्योगसुद्धा ते गुजराला घेऊन जात आहे, आता काल देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी उर्मटपणाने देशाला ज्यांनी घटना दिली, त्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा ज्या प्रकाराने उल्लेख केला, मला आता असं वाटत आता भाजपाचा बुरखा फाटला आहे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. 

उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाह यांच्या या वक्तव्यात उद्दामपणा होता. आमच्याशिवाय कोणी या देशात जन्माला आलाच नव्हता, असं चित्र भविष्यात यांना निर्माण करायचे आहे. भाजपवाले आता नेहरुंवरुन आंबेडकरांवर आले आहेत. आता अशावेळी भाजपाला पाठिंबा देणारे रामदास आठवले, शिंदे गट आणि अजित पवार गट काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल. शिंदे आणि अजित पवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान मान्य आहे का?  राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही याबाबत खुलासा केला पाहिजे. एरवी अदानींचे नाव घेतल्यावर भाजपाचे सगळे नेते तुटून पडतात. महाराष्ट्र आणि देशाने आतातरी शहाणे झाले पाहिजे. त्यांना संविधान बदलायचे आहे, हे आम्ही सांगत होतो. भाजपला महाराष्ट्रात राक्षसी बहुमत मिळालं आहे. आता महाराष्ट्राला कसंही झोडा, महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करा, अशी मस्ती भाजपला चढली आहे.  ही मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शाहBJPभाजपाShiv Senaशिवसेना