शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

'भाजपाकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान'; अमित शाह यांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:25 IST

काल संसदेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरुन विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप विरोधकांनी केला हे. आज संसदेत आज काँग्रेससह विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. शाह यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी भाजपासह केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. 

अमित शाहांच्या बचावासाठी PM नरेंद्र मोदी पुढे आले; काँग्रेसला खडे बोल सुनावले

"संसदेत संविधानावरील चर्चेवेळी अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख तुच्छतेने आणि उर्मटपणे केला, शाह यांच्यात असे बोलण्याची हिंमत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने सांगितल्याशिवाय संसदेत अशाप्रकारचे वक्तव्य शाह यांनी शक्य नाही, यामुळे आता भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर केली. 

उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या काही वर्षापासून भाजपाचे नेते महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. तो अपमान आता सहनशीलतेच्या पलिकडे गेला आहे. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला होता. आम्ही त्यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. पण भाजपाने त्यांच्यावर कारवाई केली नाही, मधल्या काळात घाईघाईने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवतानासुद्धा त्या पुतळ्यात भ्रष्टाचार केला. तो पुतळा आठ महिन्यात पडला. त्यानंतर काय घडलं आपल्या सर्वांना कल्पना आहे. महाराष्ट्र हा जणू गांडूळांचा प्रदेश आहे असं भाजपाच्या वरिष्ठांना वाटू लागले आहे. उद्योगसुद्धा ते गुजराला घेऊन जात आहे, आता काल देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी उर्मटपणाने देशाला ज्यांनी घटना दिली, त्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा ज्या प्रकाराने उल्लेख केला, मला आता असं वाटत आता भाजपाचा बुरखा फाटला आहे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. 

उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाह यांच्या या वक्तव्यात उद्दामपणा होता. आमच्याशिवाय कोणी या देशात जन्माला आलाच नव्हता, असं चित्र भविष्यात यांना निर्माण करायचे आहे. भाजपवाले आता नेहरुंवरुन आंबेडकरांवर आले आहेत. आता अशावेळी भाजपाला पाठिंबा देणारे रामदास आठवले, शिंदे गट आणि अजित पवार गट काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल. शिंदे आणि अजित पवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान मान्य आहे का?  राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही याबाबत खुलासा केला पाहिजे. एरवी अदानींचे नाव घेतल्यावर भाजपाचे सगळे नेते तुटून पडतात. महाराष्ट्र आणि देशाने आतातरी शहाणे झाले पाहिजे. त्यांना संविधान बदलायचे आहे, हे आम्ही सांगत होतो. भाजपला महाराष्ट्रात राक्षसी बहुमत मिळालं आहे. आता महाराष्ट्राला कसंही झोडा, महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करा, अशी मस्ती भाजपला चढली आहे.  ही मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शाहBJPभाजपाShiv Senaशिवसेना