शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपाकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान'; अमित शाह यांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:25 IST

काल संसदेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरुन विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप विरोधकांनी केला हे. आज संसदेत आज काँग्रेससह विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. शाह यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी भाजपासह केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. 

अमित शाहांच्या बचावासाठी PM नरेंद्र मोदी पुढे आले; काँग्रेसला खडे बोल सुनावले

"संसदेत संविधानावरील चर्चेवेळी अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख तुच्छतेने आणि उर्मटपणे केला, शाह यांच्यात असे बोलण्याची हिंमत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने सांगितल्याशिवाय संसदेत अशाप्रकारचे वक्तव्य शाह यांनी शक्य नाही, यामुळे आता भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर केली. 

उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या काही वर्षापासून भाजपाचे नेते महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. तो अपमान आता सहनशीलतेच्या पलिकडे गेला आहे. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला होता. आम्ही त्यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. पण भाजपाने त्यांच्यावर कारवाई केली नाही, मधल्या काळात घाईघाईने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवतानासुद्धा त्या पुतळ्यात भ्रष्टाचार केला. तो पुतळा आठ महिन्यात पडला. त्यानंतर काय घडलं आपल्या सर्वांना कल्पना आहे. महाराष्ट्र हा जणू गांडूळांचा प्रदेश आहे असं भाजपाच्या वरिष्ठांना वाटू लागले आहे. उद्योगसुद्धा ते गुजराला घेऊन जात आहे, आता काल देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी उर्मटपणाने देशाला ज्यांनी घटना दिली, त्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा ज्या प्रकाराने उल्लेख केला, मला आता असं वाटत आता भाजपाचा बुरखा फाटला आहे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. 

उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाह यांच्या या वक्तव्यात उद्दामपणा होता. आमच्याशिवाय कोणी या देशात जन्माला आलाच नव्हता, असं चित्र भविष्यात यांना निर्माण करायचे आहे. भाजपवाले आता नेहरुंवरुन आंबेडकरांवर आले आहेत. आता अशावेळी भाजपाला पाठिंबा देणारे रामदास आठवले, शिंदे गट आणि अजित पवार गट काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल. शिंदे आणि अजित पवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान मान्य आहे का?  राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही याबाबत खुलासा केला पाहिजे. एरवी अदानींचे नाव घेतल्यावर भाजपाचे सगळे नेते तुटून पडतात. महाराष्ट्र आणि देशाने आतातरी शहाणे झाले पाहिजे. त्यांना संविधान बदलायचे आहे, हे आम्ही सांगत होतो. भाजपला महाराष्ट्रात राक्षसी बहुमत मिळालं आहे. आता महाराष्ट्राला कसंही झोडा, महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करा, अशी मस्ती भाजपला चढली आहे.  ही मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शाहBJPभाजपाShiv Senaशिवसेना