शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

Tauktae Cyclone: “राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी”; फडणवीसांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 17:18 IST

Tauktae Cyclone: नुकसान मोठे आहे. राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ठळक मुद्देतौक्ते चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीचा देवेंद्र फडणवीसांकडून आढावाराज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी - फडणवीसप्रवीण दरेकर यांचीही उपस्थिती

रायगड: कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठा तडाखा दिल्यानंतर तौक्ते चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकले. यामुळे कोकणासह गुजरातमधील अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गेल्या २ ते ३ दिवसांपासून वीज गायब असून, शेकडो झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. नुकसान मोठे आहे. राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (bjp devendra fadnavis demands immediate compensation for tauktae cyclone in raigad)

कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर अवघ्या वर्षभरातच पुन्हा कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्याला भेट दिली. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“फडणवीस, दरेकर कोकणात; मुख्यमंत्रीही संकटग्रस्तांचे अश्रू पुसतात, अर्थात स्क्रिनवरून”

भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी

निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजून मिळाली नाही, आता वर्षभरातच या नागरिकांना दुसरा फटका बसला आहे. रायगडमध्ये जे नुकसान झालंय, त्याचा आढावा आम्ही घेतला आहे. जवळपास ८ ते १० हजार घरांचे नुकसान झाले असून, विशेषत: ५ हजार हेक्टरमध्ये फळपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी तांदूळ, इतर फळपिकांचे नुकसान झाले. जवळपास २०० शाळांचे नुकसान झाले आहे. २५ वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती देत सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

१७२ गावांमध्ये वीजपुरवठा नाही

अजूनही १७२ गावांमध्ये ७० हजार घरे अशी आहेत ज्यांना वीज पूर्ववत झालेली नाही. विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. बोटींचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यांचाही पंचनामा करावा लागेल. कोळी बांधवांचे म्हणणे आहे की, निसर्गवेळी झालेल्या नुकसानीचे पैसे अजून मिळाले नाहीत. आता हे दुसऱ्यांदा नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ नुकसानभरपाईची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpravin darekarप्रवीण दरेकरState Governmentराज्य सरकारRaigadरायगड