शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘जलयुक्त शिवार योजने’वरून भाजपा, काँग्रेसमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 05:17 IST

जलयुक्त शिवार योजना राबवूनही नोव्हेंबर महिन्यात राज्यात टँकरच्या संख्येत झालेली वाढ चक्रावून टाकणारी आहे. यामुळे या योजनेचे पितळ उघडे पडल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते आणि सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला.

मुंबई : जलयुक्त शिवार योजना राबवूनही नोव्हेंबर महिन्यात राज्यात टँकरच्या संख्येत झालेली वाढ चक्रावून टाकणारी आहे. यामुळे या योजनेचे पितळ उघडे पडल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते आणि सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला. त्यावर भाजपाकडून तत्काळ खुलासा करण्यात आला. सावंत यांनी मे अखेरची आकडेवारी घेतली असती, तर त्यांच्याच सरकारचे पितळ उघडे पडले असते, असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला. त्यावर मे २०१८ मध्ये १,६२२ टँकर लावल्याची आकडेवारी सावंत यांनी बुधवारी जाहीर केली.भाजपाच्या अकार्यक्षम, भ्रष्टाचारी कारभारावर बोट ठेवल्यामुळे भाजपाचे प्रवक्ते खोटे आकडे देत आहेत. नोव्हेंबर महिन्यातील आकडेवारी दाखविता येत नाही, हे पाहून मे महिन्यातील आकडेवारी दाखविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात आहे, असा आरोप सावंत यांनी केला.२०१३ मध्ये १०९ टक्के पाऊस पडून २,३२२ टँकर, तर २०१४ मध्ये ७० टक्के पावसात २,३५८ टँकर होते. टँकर लॉबी काँग्रसने पोसली होती, असा आरोप करून केशव उपाध्ये म्हणाले, युती सरकारच्या काळात मे २०१६च्या अखेरीस ९५ टक्के पाऊस पडूनही १,३४३ टँकर होते. त्यावर सावंत यांनी ३० मे २०१६ रोजी राज्यात ५,९२३ टँकर चालू असल्याची आकडेवारी सरकारच्याच संकेतस्थळावर असल्याचे दाखवून दिले. भाजपाने खरी आकडेवारी दिली असती, तर आमचे समाधान झाले असते. मात्र, भाजपाच्या खुलाशातून खोटेपणा आणि प्रवक्त्यांचे अज्ञान दिसून येते, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाJalyukt Shivarजलयुक्त शिवार