शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 18:08 IST

BJP Chitra Wagh News: मोठ्या ताई किती बोलणार? अडीच वर्षे सत्तेत होता त्यावेळी काय केले? कथनी आणि करणी यात फरक असतो, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

BJP Chitra Wagh News: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणाचे नाव घेतले नाही मग शरद पवारांनी या गोष्टी मनाला का लावून घेतल्या? संजय राऊत हा सर्वज्ञानी आहेत. संजय राऊत नेहमी काँग्रेसचे तुणतुणे घेऊन नाचायचे काम करतात. महाराष्ट्रातील सगळ्या लोकसभा मतदारसंघात मी जात आहे याचाच भाग म्हणून बारामतीत आले आहे. पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्यांकडून असे वक्तव्य करणे शॉकिंग आहे. मात्र असे असले तरी यावेळी शरद पवारांच्या सुनबाईचं दिल्लीला जाणार हे नक्की आहे, असा विश्वास भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.

मीडियाशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, रोहित पवारांनी बारामतीमधील एक महिला किंवा पुरुष दाखवावा, ज्यांनी मोदींच्या एकाही योजनेचा लाभ घेतला नाही. गरीब कल्याण योजना २० लाख लाभार्थी, पीएम आवास योजना ७८ हजार, आयुष्मान भारत साडेचार लाख, जनधन योजना १०० टक्के, जल जीवन मिशन योजना २ लाख,आणि पीएम किसान योजना अडीच लाख, स्वच्छ भारत मिशन ९६ हजार एवढ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी केंद्रातील भाजपा सरकारच्या विविध योजनेचा लाभ घेतला आहे. कोरोनाची लस आणली, त्याचे शरद पवार आणि कुटुंबीयही लाभार्थी आहेत, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. 

कोणाचा बाप आला तरी संविधानाला हात लावू शकत नाही कोणाचा बाप आला तरी संविधानाला हात लावू शकत नाही. कुठेतरी आमच्या  विरोधात चुकीच्या गोष्टी पसरवण्याचे काम विरोधक करीत आहेत.  काँग्रेसच्या काळात संविधानात ९० बदल करण्यात आले आहे. ज्यांनी संविधान दिले, त्यांना निवडणुकीत दोनदा पाडण्याचे पाप या काँग्रेसने केले, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

दरम्यान, मोठ्या ताई किती बोलणार? अडीच वर्षे सत्तेत होता त्यावेळी काय केले? कथनी आणि करणी यात फरक असतो, ज्यावेळी सत्तेत असतात त्यावेळी सगळे विसरून जातात विरोधक आल्यावर त्यांना सगळं आठवते. त्या काय बोलतात याला महत्त्व नाही, त्यांची परिस्थिती बघून मला खूप हसायला येते. वाहनात बसून एखाद्याचे रील काढून घ्यायचे, लगेच व्हायरल करायचे हेच त्यांचे काम आहे. तोंडाने म्हणायचं रामकृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटणकरी.  सुप्रिया सुळे यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे, या शब्दांत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केला. 

टॅग्स :baramati-pcबारामतीChitra Waghचित्रा वाघMahayutiमहायुतीBJPभाजपाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४