शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

“आता ठाकरेंच्या उमेदवारांना कोणी मत देणार नाही, उद्धवसेनेतील अनेक जण भाजपात येण्यास इच्छूक”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:29 IST

BJP Chandrashekhar Bawankule News: वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरील भूमिकेवरून ठाकरेंकडील हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते पक्ष सोडून जाण्याच्या मानसिकतेत असून, आगामी काही दिवसांत अनेक जण भाजपात प्रवेश करून शकतात, असा दावा करण्यात आला आहे.

BJP Chandrashekhar Bawankule News: बुधवारचा दिवस वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून चांगलाच गाजला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी केवळ यावर राजकीय मते व्यक्त केली नाही, तर सुधारणा विधेयकावर लोकसभेत विस्तृत चर्चा झाली. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आपापले म्हणणे मांडले. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत दीर्घ चर्चेनंतर मध्यरात्री मतदानाने पारित करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ एवढी मते पडली. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर भाजपा नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर पलटवार केला जात आहे. 

जर हिंदूत्ववादी असाल तर भाजपाने त्यांच्या झेंड्यावरील हिरवा रंग काढावा. फटाक्यांची वात पेटवायची आणि पळून जायचे ही भाजपाची वृत्ती आहे. त्याला आम्ही विरोध केला. वक्फच्या जमिनी बळकावून त्यांच्या व्यापारी मित्रांना दिल्या जाणार त्याचा आम्ही विरोध केला आहे. भाजपाचे नेते अमित शाह, किरेन रिजिजू, टीडीपी, जेडीयू यांनी ज्याप्रकारे मुस्लीम समाजाची भूमिका मांडली. गरीब मुस्लिमांसाठी हे विधेयक आणले. मराठीत त्याला लांगुनचालन म्हणतात तेच तुम्ही करत होता. तोडा, फोडा आणि राज्य करा ही भाजपाचे धोरण आहे. वक्फ सुधारणा विधेयक जर मुस्लिमांच्या हिताचे आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले की तुम्ही सोडले? उद्या हिंदू देवस्थानावर गैर हिंदू लादला तर ते आम्ही सहन करू का? तर नाही. तसेच वक्फ बोर्डावर गैर मुस्लीम ते कसे सहन करतील, असे सांगत उद्धव ठाकरेंनी टीका केली. याला भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

आता ठाकरेंच्या उमेदवारांना कोणी मत देणार नाही

पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे व त्यांच्या खासदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षातील कार्यकर्ते व शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांच्या खासदारांनी वक्फ सुधारणा विधेयकाचा विरोध करून महाराष्ट्राचा व देशाचा अपमान केला आहे. त्यामुळे जनता उद्धव ठाकरेंना माफ करणार नाही. ज्या लोकांनी त्यांचे खासदार निवडून दिले त्यांना आता वाईट वाटत असेल की, आता आपली चूक झाली, आपण उगाच उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे जनता आता उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना निवडून देणार नाही. कारण त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केला आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला. 

ठाकरेंकडील हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते पक्ष सोडून जाण्याच्या मानसिकतेत

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरे यांनी सोडले आहेत. त्यांनी काँग्रेसचे विचार मान्य केल्याचा हा आणखी एक पुरावा आहे. मतांसाठी ते काही लोकांचे लांगुलचालन करत आहेत. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, विशिष्ट समाजाचा विचार करून त्यांच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते, त्यांचे शिवसैनिक शिवसेना सोडून जाण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यासंदर्भात मला कालपासून फोन येत आहेत. आजही अनेक मेसेज आले आहेत. मला भाजपात पक्ष प्रवेश घ्यायचा आहे अशी विचारणा होत आहे. आगामी काळात अनेक जण पक्षप्रवेश करू शकतात, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. 

 

 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा