शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

“आपले सरकार येऊनही देवेंद्र फडणवीसांना DCM व्हावे लागले याचे दुःख झाले”: चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 16:20 IST

BJP Chandrashekhar Bawankule News: देवेंद्र फडणवीस हे आधुनिक अभिमन्यू आहेत. आधीच म्हणालो होतो की, महायुतीचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील. कार्यकर्ते कामाला लागले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

BJP Chandrashekhar Bawankule News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्या कामावर विश्वास होता. विधानसभा निवडणूक आपण ग्रामपंचायतीप्रमाणे लढलो. लोकसभेला खोटा प्रचार विरोधकांनी केला. त्यात आपल्याला फटका बसला. त्यातून आपण खचलो नाही, तर लढलो. संघटनेला आणखी मजबूत करायचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यात आपल्याला महायुतीची तयारी करायची आहे. पक्षाचीही तयारी करायची आहे. तुम्ही आम्हाला सत्तेवर बसवले आहे, आता तुम्हाला सत्तेत आणायचे आहे, असे प्रतिपादन भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 

शिर्डीत भाजपाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अधिवेशन शिर्डीत होत असतानाच पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्षपदी तूर्तास चंद्रशेखर बावनकुळे कायम राहणार असले तरी दोन महिन्यांनी संघटनात्मक निवडणुकीनंतर चव्हाण पूर्णवेळ अध्यक्ष होतील. चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात. राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला नव्हता, तेव्हाच त्यांना प्रदेशाध्यक्ष करणार हे स्पष्ट झाले होते. भाजपमध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ असा नियम आहे. 

आपले सरकार येऊनही देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले याचे दुःख झाले

सन २०१९ला आपल्यासोबत बेईमानी झाली होती. देवेंद्र फडणवीस यांना चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. आपले सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले, तेव्हा डोळ्यात पाणी आले होते. दुःख झाले. परंतु, देवेंद्र फडणवीस हे आधुनिक अभिमन्यू आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. कोल्हापुरात म्हणालो होतो की, महायुतीचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील. कार्यकर्ते कामाला लागले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, असे बावनकुळे यांनी सांगितले.

दरम्यान, श्रद्धा आणि सबुरी महत्त्वाची आहे. मतदारांनी आपल्याला भरघोस मतदान केले. पदाधिकारी यांनी जीवाचे रान केले म्हणून आपल्याला यश मिळाले. कार्यकर्त्यांसाठी हे अधिवेशन आहे. महाराष्ट्रात धन्यवाद मोदीजी असा कार्यक्रम घेतला पाहिजे, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी बोलून दाखवली.

 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाshirdiशिर्डी