शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

...म्हणून भाजपानं युती तोडली, एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदावरून संजय राऊतांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 12:44 IST

परंतु निकाल लागल्यानंतर भाजपाने शब्द फिरवला असा आरोप संजय राऊतांनी केला.

मुंबई – एकनाथ शिंदे यांनाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री करणार होते. परंतु भाजपाने मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला. भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण हे विचारले तेव्हा आम्ही एकनाथ शिंदे असं नाव सांगितले. त्यानंतर ही युती तोडली असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्रिपदावरून राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले की, आता भाजपा भंपक बोलतायेत. महाराष्ट्राच्या जनतेला खोटं सांगून दिशाभूल करू नका. शिवसेना फोडून त्याच एकनाथ शिंदेंना तुम्ही मुख्यमंत्री करता. त्यामुळे तुम्ही कटकारस्थान करून हे सगळे केले. शिवसेनेबद्दल कपट भावना भाजपाच्या मनात होती. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, एनडीएच्या बैठकीत त्यांनी युतीबाबत केलेले विधान असत्य आहे. २०१४ मध्ये भाजपाने युती तोडली ती एका जागेवरून..ही युती तोडण्याची जबाबदारी पक्षाने एकनाथ खडसेंवर सोपवली. खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्या सूचनेवरून भाजपाने शिवसेनेसोबत युती तोडली. मोदी लाट होती त्यामुळे स्वबळावर भाजपाची सत्ता हवी होती म्हणून २५ वर्षाची युती तोडली. २०१९ मध्येही भाजपाने शिवसेनेसोबत युती तोडली. जागावाटप, सत्तावाटप एकमत झाले.  पॉवर शेअरिंग ५०-५० टक्के होते. परंतु निकाल लागल्यानंतर भाजपाने शब्द फिरवला असा आरोप संजय राऊतांनी केला.

दरम्यान, केंद्रीय गृहविभागाकडून यंदा राज्याच्या पोलीस दलासाठी एकही पदक दिले नाही यावर बोलताना या राज्याला कर्तबगार मुख्यमंत्री, सक्षम गृहमंत्री आणि २ कर्तबगार उपमुख्यमंत्री लाभलेत त्यांनी बोलायला हवं. प्रत्येकवेळी महाराष्ट्राचा अपमान दिल्लीकडून होतोय त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवे. उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचा कारभार करायला मुख्यमंत्री झालोय की आराम करायला झालोय हे स्पष्ट करावे. मुख्यमंत्री आरामाला गेलेत असं वाचले. महाराष्ट्राच्या अस्मितेवर स्वाभिमानावरील विषयावर बोलायला हवे. आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला परवडणार नाही. महाराष्ट्राला डावललं जाते. प्रत्येकवेळी महाराष्ट्राचा अपमान होतोय हे धोरण सरकारने स्वीकारले आहे. तुमच्या मानेत गुलामगिरी पट्टा बांधलाय त्यावर बोला असं आव्हानही राऊतांनी भाजपाला दिले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे