शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानवा महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
3
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
4
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
5
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
6
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
7
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
8
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
9
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
10
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
11
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
12
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
13
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
14
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
15
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
16
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
17
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
18
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
19
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
20
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

"ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते 'घरातील महामहीम' उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 17:39 IST

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर टीका केली होती. या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत ठाकरेंवर आरोप केले, यावर आता माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी या सरकारने राजीनामे द्यावेत अशी मागणी केली आहे. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

"ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते 'घरातील महामहीम' उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार?" असा सवाल विचारला आहे. तसेच "त्यांचे आपले तेच ते सुरू आहे, आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, मै घर में बैठता हूं!" असं म्हणत उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"उच्च न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देणाऱ्या, पण पोलिसांच्या कारवाईसाठी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी माफी मागून मनाचा मोठेपणा दाखविला. पण ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते 'घरातील महामहीम' उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार? आमची अपेक्षा होती की आज स्वतः ते राज्यपालांना भेटून माझ्या काळात मराठा आरक्षण गेले, मी राज्याच्या तमाम जनतेची माफी मागतो, असे सांगतील. पण त्यांचे आपले तेच ते सुरू आहे, आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, मै घर में बैठता हूं!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या सरकारच्या काळात आरक्षण टीकलं नाही, तेव्हा बाकीचे विकेट किपर होते तेव्हा काही का केलं नाही, अजितदादाही आमच्या सरकारमध्ये होते. माझ काय चुकत होतं तेव्हा त्यांनी सांगायला हवं होते. आम्ही कुठेही वकील बदललेले नव्हते. आता महत्वाच म्हणजे त्यावेळचे अपयश मला देत असाल तर आता तुम्ही डोकी फोडली आहेत, त्याची जबाबदारी सगळ्यांनी टीम वर्क म्हणून स्वीकारली पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.

"आतापर्यंत मी गृहमंत्र्यांचा राजीमाना मागत होतो, आता टीम वर्क म्हणून या तिघांनीही राजीनामा दिला पाहिजे. हा दोष त्यांच्या टीमचा आहे.एकुणच हे तीन तिघाडी सरकार आहे, ट्रीपल इंजिन न्याय, हक्कासाठी रस्त्यावर यायच नाही, नाहीतर आम्ही मारहाण करु, असंच या सरकारच सुरू आहे. बारसुमध्ये असंच झालं होतं. जबाबदारी कोण घेणार? आदेश कुणी दिला? डोळ्या देखत जर पोलीस न जुमानत वागत असतील तर त्यांचा प्रशासनावर कंट्रोल नाही असा याचा अर्थ होतो त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaratha Reservationमराठा आरक्षणAshish Shelarआशीष शेलारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस