शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

"उद्धव ठाकरेंसारखा अहंकारी नेता झाला नाही..."; आशिष शेलारांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 18:08 IST

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे."उद्धव ठाकरे यांच्यासारखा अहंकारी नेता या राज्यांमध्ये कधी न झाला ना कधी होईल, स्वतःच्या स्वार्थाशिवाय दुसरा कुठलाही विचार सुचत नाही" असं म्हणत खोचक टीका केली आहे. तसेच "ज्यांना राजकीयदृष्ट्या हे राम म्हणण्याची वेळ आली आहे त्यांच्या आवाजात न बळ आहे ना त्यात तथ्य आहे" असंही म्हटलं आहे. 

"जो उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेला त्यांची वाताहत करण्याचे काम उबाठा गटाने केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखा अहंकारी नेता या राज्यांमध्ये कधी न झाला ना कधी होईल. ज्यांना स्वतःच्या स्वार्थाशिवाय दुसरा कुठलाही विचार सुचत नाही. अगदी मित्र पक्षाचाही विचार सुचत नाही. याचा अनुभव आम्ही घेतला आहे. आता काँग्रेसला तो फटका बसत आहे. याबद्दल मिलिंद देवरा यांनी वाच्यता केली आहे. आता उरल्या-सुरल्या काँग्रेसची धूळधाण उद्धव ठाकरे करतील हे महाराष्ट्र बघेल."

"राजकीयदृष्ट्या हे राम म्हणण्याची वेळ"

"ज्यांना राजकीयदृष्ट्या हे राम म्हणण्याची वेळ आली आहे त्यांच्या आवाजात न बळ आहे ना त्यात तथ्य आहे. भगवान रामाबद्दल जेवढा अपमान संजय राऊत यांनी केला तेवढा अपमान आयएसआय संघटनेच्या लोकांनी केला की, नाही हा प्रश्न आहे. राम वर्गणीच्या बाबतीत संजय राऊत यांनी कुचेष्टा केली. राम मंदिराच्या जागेबाबत वाद निर्माण केला. रामसेतूवर प्रश्न करणाऱ्यांबरोबर सलगी केली. राम भक्तांवर गोळ्या मारणाऱ्याबरोबर हात मिळवणी केली. राम भक्ताच्या खुनाचे रक्त संजय राऊत यांच्या पक्षाच्या हाताला लागले आहे. आता भगवान रामाला एका पक्षामध्ये बांधण्याचे काम तेच करत आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांना हे राम म्हणण्याची वेळ आली आहे. संजय राऊत यांच्या पत्रकारितेची डिग्री तपासली पाहिजे" असं म्हणत आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला आहे.

"महायुतीतील सर्व सहा जागा जिंकू"

"महायुतीतील सर्व सहा जागा जिंकून आणण्यासाठी आम्ही कंबर कसली आहे. आम्ही त्याचा आढावा घेऊन योजना बांधत आहोत. नियोजन करत आहोत. बूथ स्तरावर गट स्तरावर, समाज वर्ग स्तरावर, भाषावर वर्ग स्तरावर  त्याबद्दलची योजना आणि आखणी करत आहोत. तीन लोकसभेचे काम पूर्ण झाले आहे. उरलेल्या तीन लोकसभांचे काम आज पूर्ण झालेले आहे. सहाही लोकसभा आम्ही जिंकू" असा आशावाद शेलार यांनी व्यक्त केला.

"फिल्मफेअरचे कार्यक्रम देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. ती काही सरकारी योजना नाही. सरकार त्यावर जीआर काढून नियम करते अशी भूमिका नाही. त्यासाठी सबसिडी सरकार देत नाही. त्यांच्या सोयीने हा एका वर्तमानपत्राच्या विभागाचा विषय आहे. त्यामुळे त्या वर्तमानपत्राच्या मालकाला ते विचारा. वडेट्टीवार यांनी अडीच वर्षांमध्ये त्यांचे सरकार असताना जे काही वाढून ठेवले आहे त्यातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर त्यांनी कधीतरी भाष्य करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाबद्दल कोणी बोलत असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे" असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत