शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Ashish Shelar : "उखाड देंगे बोलणारे आता जेलमध्ये"; आशिष शेलारांचा संजय राऊतांना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 15:25 IST

BJP Ashish Shelar Slams Shivsena Sanjay Raut : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

मुंबई - पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहारप्रकरणी ईडी कोठडीत असलेले शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. राऊत यांना औषधे आणि घरचे जेवण देण्याची परवानगी न्यायालयाने दिली. त्यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. राऊत यांची ईडी कोठडी ८ ऑगस्टला समाप्त झाली. ईडीने सोमवारी राऊत यांना विशेष न्यायालयात उपस्थित केले. राऊत यांच्या अतिरिक्त कोठडीची आवश्यकता नसल्याचे ईडीतर्फे विशेष न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांनी राऊत यांची प्रकृती विचारात घेत त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर आता भाजपाने राऊतांना खोचक टोला लगावला आहे. 

"उखाड देंगे बोलणारे आता जेलमध्ये" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. "ज्यावेळी एखादा पक्ष बलवान होतो. तेव्हा बाकिच्यांना स्पेस कमी होते. भारतीय जनता पक्षाने कुठलाही पक्ष संपवणे, फोडणे, उखाडणे असं म्हटलेलं नाही. उखाड देंगे म्हणणारे आता जेलमध्ये गेलेत. संपवण्याची भूमिका बोलणारे कोण? त्यांची वाताहत झालीय़. भाजपाने हे सर्व सहन केलं. असा विचारही कधी भाजपाने केला नाही. इंडिया म्हणजे आम्ही आणि आम्ही म्हणजे इंडिया हे बोलणाऱ्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये" असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं. 

बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपाशी असलेली आघाडी तोडून नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूंच्या आरजेडीसोबत जवळीक साधली आहे. आता नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेत आरजेडीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या संपूर्ण घडामोडींमध्ये भाजपाचा गेम झाल्याचे दिसत आहे. एवढ्या घडामोडी घडत असताना भाजपा त्यापासून अनभिज्ञ कसा काय राहिला. बिहारमधील घडामोडींकडे भाजपानं दुर्लक्ष केलं की कुठलाच पर्याय नसल्याने जे घडतंय ते पाहत राहण्याची हतबलता भाजपावर आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच दरम्यान भाजपाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

"नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्याला राजकारणातला उद्धव मार्ग म्हणतात"

राजकारणातला उद्धव मार्ग असं म्हणत डिवचलं आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्याला राजकारणातला उद्धव मार्ग म्हणतात" असं म्हटलं आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात घडत असलेल्या घडामोडी राजकीय चर्चांचे केंद्र बनल्या होत्या. भाजपाने आपलं सगळं लक्ष महाराष्ट्रातील सत्तांतरावर केंद्रित केलं होतं. त्यातूनच भाजपाने एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला बळ दिलं. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना