राज्यातील रिक्त राहिलेल्या जिल्हाध्यक्षपदांसाठीची निवड भाजपाकडून जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून एकूण २२ नेत्यांकडे जिल्हास्तरावरील महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाकडून राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील अध्यक्षांची निवड करण्यात आली होती. मात्र काही जिल्ह्यातील नावांची घोषणा करण्यात आली नव्हती अखेर आज त्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील मिळून एकूण २२ नेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
भाजपाकडून आज जाहीर करणयात आलेल्या जिल्ह्याध्यक्षांच्या यादीमध्ये पालघरच्या जिल्हाध्यक्षपदी भरत राजपूत, वसई-विरारच्या जिल्हाध्यक्षपदी प्रज्ञा पाटील, अहिल्यानगर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते, नाशिक शहरच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील केदार, नाशिक दक्षिणच्या अध्यक्षपदी सुनील बच्छाव, नाशिक उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी यतीन कदम, पुणे दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी शेखर वडणे, कोल्हापूर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
तर गडचिरोलीच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश बारसागडे, चंद्रपूर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी सुभाष कासमगुट्टवार, चंद्रपूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी हरिश शर्मा, वर्ध्याच्या जिल्हाध्यक्षपदी संजय गाते, परभणी ग्रामीणच्या शहराध्यक्षपदी सुरेश भुबंरे, छत्रपती संभाजीनगर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर शितोळे, तालुर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी अजित पाटील कव्हेकर, लातुर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी बसवराज पाटील, नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर देशमुख, नांदेड दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी संतुकराव हंबर्डे, बीडच्या जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबईमधील तीन जिल्हाध्यक्षांची निवडही करण्यात आली असून, मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानमूर्ती शर्मा, दक्षिण मध्य मुंबईच्या अध्यक्षपदी निरंजन उभारे आणि दक्षिण मुंबईच्या अध्यक्षपदी शलाका साळवी यांची निवड करण्यात आली आहे.