शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

भाजपा व उद्धव हे दोनच सरकारचे लाभार्थी , विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 20:01 IST

गेल्या तीन वर्षात सरकारने महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे काम केले. सरकारने केलेली कामे दिसलीच नाहीत, म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून ‘मी लाभार्थी, हे माझे सरकार’ अशा फसव्या जाहिराती करण्यात आल्या.

नागपूर : गेल्या तीन वर्षात सरकारने महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे काम केले. सरकारने केलेली कामे दिसलीच नाहीत, म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून ‘मी लाभार्थी, हे माझे सरकार’ अशा फसव्या जाहिराती करण्यात आल्या. या सरकारचा सामान्याला लाभच झाला नाही. भाजपा व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे दोन या सरकारचे खरे लाभार्थी आहेत, अशी बोचरी टीका विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी केली. 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर विरोधी पक्षाची बैठक झाली. या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदींनी सरकार सर्वच प्रश्नांवर अपयशी ठरल्याचा आरोप करीत सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली. तीन वर्षात सरकार कोणकोणत्या मुद्यांवर अपयशी ठरले याचा एक फलकच विरोधकांनी तयार करून लावला आहे.  या फलकाकडे इशारा करीत विखे पाटील म्हणाले, सरकारने दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. आता जनता ‘क्या हुवा तेरा वादा..’ असे मुख्यमंत्र्यांना विचारू लागली आहे. जनतेसोबतच आता भाजपाच्या खासदार, आमदारांमध्ये खदखद सुरू झाली आहे. नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. ओखी वादळ हे नैसर्गिक संकट होते, तर भाजपाचे सरकार सुलतानी संकट आहे. हे दोन्ही संकट गुजरातमार्गे महाराष्ट्रात दाखल झाले, अशी टीकाही त्यांनी केली. 

धनंजय मुंडे म्हणाले, सरकारच्या विविध मंत्र्यांचे विविध घोटाळे आम्ही बाहेर काढले. त्याचे सरकारला पुरावेही दिले. मात्र, सरकारची पारदर्शकता अशी झाली की, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मागितलेली फाईल द्यायची की नाही यावर निर्णय घेण्यासाठी तीन सचिवांची समिती नेमली. गुजरातमध्ये जसा ‘विकास’ पागल झाला आहे. तशी महाराष्ट्रात ‘पारदर्शकता’ पागल झाली आहे, अशी बोचरी टीका मुंडे यांनी केली. बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांचे ३० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. या शेतकºयांना एकरी २५ हजार रुपयांची मदत देण्याची मागणी मुंडे यांनी केली.  

कर्जमाफीच्या याद्या सभागृहात सादर करा

-कर्जमाफीचा घोळ आॅनलाईनमुळे झाला. सरकारने माहिती व तंत्रज्ञान खात्याच्या सचिवांची बदली केली. मात्र, आॅनलाईचे काम करणारी इनोव्हेव कंपनी याची लाभार्थी आहे. तिच्यावर कारवाई झालेली नाही. कर्जमाफीसाठी अर्ज करणाºया शेतकºयांची यादीचे चावडीवर वाचन करून शेतकºयांची इज्जत काढल्या गेली. पण किती शेतकºयांना नेमकी किती कर्जमाफी देण्यात आली याची अद्याप आकडेवारी दिली गेली नाही. सरकारने विधिमंडळ सभागृहात कर्जमाफीच्या याद्या सादर कराव्या, अशी मागणी विखे पाटील व मुंडे यांनी केली. तर, कर्जमाफीची रक्कम जमा करण्यावरून मुख्यमंत्री व सहकारमंत्री वेगवेगळ्या तारखा देत असल्याचे सांगत कर्जमाफीच्या मतदारसंघनिहाय याद्या जाहीर करण्याची मागणी अजित पवार यांनी केली.

यादव सापडत नसेल तर मुख्यमंत्र्यांचा मोबाईल तपासा-

- भाजपचे नेते मुन्ना यादव हे फरार आहेत. त्यांना शोधण्यात पोलिसांना अपयश येत आहेत. यादव सापडत नसेल तर मुख्यमंत्र्यांचे मोबाईल तपासा, म्हणजे यादवांचे लोकेशन कळेल, असा चिमटा मुंडे यांनी गृहखाते स्वत:कडे ठेवलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना काढला. तर यशवंत सिन्हा तुरुंगात व यादव बाहेर, असा सरकारचा कारभार सुरू असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.

उद्धव ठाकरेंची इशा-यांच्या शतकाकडे वाटचाल-

- उद्धव ठाकरे यांनी आजवर ९३ वेळा सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे दिले आहेत. त्यांची शतकाकडे वाटचाल सुरू आहे. यासाठी त्यांचे अभिनंदन करीत विखे पाटील यांनी चिमटा काढला. एकीकडे उद्धव ठाकरे हे देश खड्ड्यात चालला आहे, असे म्हणतात. तर दुसरीकडे खड्डे खोदण्यासाठी मदत करतात. गरज कुणाची आहे, ते स्वत:च्या गरजेसाठी असे बोलतात, असा टोलाही त्यांनी लगावला. 

सरकार दिळखोरीकडे : अजित पवार

- राज्य सरकारची वाटचाल दिवाळखोरीकडे सुरू आहे. सरकारकडे विकास कामांसाठी पैसा नाही. जिल्हा नियोजन समितीच्या निधीला ३० टक्क्यांपर्यंत कट लावण्यात येत आहे. कर्जमाफीसाठी रक्कम वळविण्यात आली, असे कारण समोर केले जात आहे. प्रशासनातील महत्वाचे पदे रद्द करून बचत करू पाहत आहेत. यामुळे प्रशसाकीय कामाची गती मंदावली आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला. 

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूर