शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 07:07 IST

Bihar Assembly Election Result: बिहारमध्ये भाजप-जदयूला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुतीचे आणि त्यातही भाजपचे मनोबल वाढणार असून, काँग्रेसच्या आव्हानांमध्ये भर पडली आहे. 

मुंबई -  बिहारमध्ये भाजप-जदयूला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुतीचे आणि त्यातही भाजपचे मनोबल वाढणार असून, काँग्रेसच्या आव्हानांमध्ये भर पडली आहे.

बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध काँग्रेस नेते राहुल गांधी, तर नितीशकुमारविरुद्ध तेजस्वी यादव असा सामना होता. मोदी-नितीशकुमार यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्याचे निकालात दिसले. नितीशकुमार यांच्या जदयुचे महाराष्ट्रात अस्तित्व नाही. मात्र, आपल्या सर्वोच्च नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली असताना विजय मिळाल्याने भाजपचे कार्यकर्ते, नेते यांना बळ मिळाले आहे. 

‘लाडकी बहीण’चा फायदामहाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या आधी महिन्याकाठी दीड हजार रुपये देणारी लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने आणली आणि त्याचा प्रचंड फायदा महायुतीला निकालात झाला होता. बिहारमध्ये त्याच धर्तीवर, पण एकदा दहा हजार रुपये लाखो महिलांना देण्यात आले, त्याचा मोठा फायदा जदयू-भाजप युतीला झाला. 

‘ते’ भाकीत ठरले खोटे बिहारमधील निकालानंतर केंद्रातील सरकार कोसळेल व महाराष्ट्रातही त्याचे परिणाम दिसतील असे भाकीत उद्धवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केले होते. मात्र, ते भाकीत सपशेल खोटे ठरले आहे.  विधानसभेला महाराष्ट्रात मविआला दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यातून अद्यापही सावरलेली नसताना मविआला आता हा ‘जोर का झटका’ मिळाला आहे.

महाराष्ट्रात काय होणार?बिहारमधील मतदारयाद्यांवरून राजद व काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगासह केंद्र व बिहार सरकारवर आरोपांची राळ उठविली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणा आणि महाराष्ट्र, बिहारमधील मतचोरीचे अनेक आरोप केले. मात्र, या आरोपांचाही मतदारांवर परिणाम झाला नाही हे बिहारच्या निकालाने दिसले. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, उद्धवसेना, शरद पवार गटाने मतचोरी आणि दुबार मतदारांवरून रान उठविले, त्याचा परिणाम आगामी निवडणुकीत होणार का, हे बघणे औत्सुक्याचे असेल. बिहारच्या निकालामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत बिहारी व हिंदी मते भाजपच्या बाजूने एकटतील असेही म्हटले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Victory Boosts Ruling Alliance for Local Body Elections

Web Summary : Bihar's BJP-JDU victory strengthens Maharashtra's ruling alliance for local elections, boosting BJP morale. Congress's vote-rigging claims failed in Bihar. Similar financial schemes aided the victory. Uddhav Sena's predictions proved false. Mumbai elections may see increased BJP support from Bihari voters.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपाMahayutiमहायुती