शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंची कमाल! ‘या’ गावात सभा घेतली, तिथेच बिनविरोध सत्ता आणली; शिंदे गटाला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 15:54 IST

Maharashtra Political Crisis: मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे गटाला धक्का बसला असून, आदित्य ठाकरेंची जादू चालल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठकांचा सपाटा लावल्याचे दिसत असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. निष्ठा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून  राज्यभर दौरे सुरू केले आहेत. दुसरीकडे शिंदे गटाला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मात्र, यातच आता आदित्य ठाकरेंनी सभा घेतलेल्या एका गावात शिवसेनेला दणकून फायदा झाला आहे. ज्या गावात आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली होती, त्याच गावात शिवसेनेची बिनविरोध सत्ता आली आहे. 

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, या मंत्रिमंडळात पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांना संधी मिळाली आहे. मात्र, दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून धक्का बसला आहे. भुमरे यांच्या मतदारसंघातील ज्या गावात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली होती, त्या गावातील विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर शिवसेनेचे १३ पैकी १३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.  

संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंची 'शिव संवाद यात्रा'

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातून आधी निष्ठा यात्रा आणि नंतर शिव संवाद यात्रा काढत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसत आहे. पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघातील बिडकीन गावात सुद्धा आदित्य ठाकरेंची शिव संवाद यात्रा होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सभा घेत जनतेशी संवाद साधला होता. त्यांनतर या गावात झालेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाने संपूर्ण उमेदवार बिनविरोध निवडून आणल्याचा दावा केला आहे. शिवसेना तालुका प्रमुख मनोज पेरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

दरम्यान, बिडकीन गावात शिवसेनेला सत्ता मिळाली असली तरीही, गेल्या आठवड्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भुमरे यांना एकहाती सत्ता मिळाली आहे. पैठणमध्ये एकूण ७ ग्रामपंचायतसाठी निवडणूक झाली होती. तर सातपैकी ६ ग्रामपंचायतवर भुमरे यांचे वर्चस्व पाहायला मिळाले. तर पैठण तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत भुमरे यांच्या ताब्यात आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याने तालुक्यात ताकद वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAaditya Thackerayआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे