शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मविआला मोठा धक्का: प्रकाश आंबेडकरांचा व्हिडिओतून 'वेगळा' सूर, कार्यकर्त्यांना म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 13:14 IST

Mahavikas Aghadi: निवडणुकीत अडचण येऊ नये म्हणून आम्हीही व्यक्तिगत हेवेदावे केले नाहीत. मात्र आता चळवळीलाच लाचार केलं जात आहे , असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

VBA Prakash Ambedkar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही वंचितसोबतचे जागावाटप निश्चित करण्यात मविआच्या नेत्यांना अपयश आलं. असं असलं तरी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आघाडीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, याची वाट पाहू, अशी भूमिका आतापर्यंत प्रकाश आंबेडकर यांनी घेतली होती. परंतु आज प्रकाश आंबेडकर हे निर्णायक भूमिका घेण्याची शक्यता असून याबाबतचे संकेत त्यांनी एक व्हिडिओ जारी करून दिले आहेत. आपल्या चळवळीला लाचार करत संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

"वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या मतदारांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन," अशा शीर्षकाखाली वंचित आघाडीकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, "वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी वंचित आघाडीने युतीबाबत काय केले पाहिजे, याबाबतचा सल्ला दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. माझ्या आजोबांनी चालवलेली चळवळ लाचारीच्या विरोधात होती आणि लाचारी मीही मान्य करणार नाही. निवडणुकीत अडचण येऊ नये म्हणून आम्हीही व्यक्तिगत हेवेदावे केले नाहीत. मात्र आता चळवळीलाच लाचार केलं जात आहे आणि लाचार करून संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आम्ही कदापीही मान्य करणार नाही," असं म्हणत आंबेडकर यांनी अप्रत्यक्षरित्या मविआला इशारा दिला आहे. 

आपल्या समर्थकांना आवाहन करताना प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, "मी सर्व शाहू-फुले-आंबेडकरवादी मतदाराला मी सांगतो की, काही गोष्टी उघड बोलू शकत नाही, मात्र काही ठिकाणी आपण जिंकणार आहोत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे चळवळीचा विचार हा सर्वांत महत्त्वाचा आहे. आपण सार्वजनिक जीवन जगतो आणि जो सार्वत्रिक निर्णय आहे, त्याला आपण सर्वांना मान्य केलं पाहिजे. तेव्हा वंचित बहुजन आघाडी जी भूमिका घेईल, त्या भूमिकेला शाहू-फुले-आंबेडकरी विचाराच्या प्रत्येकाचा पाठिंबा असेल, असं मी गृहित धरतो," अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला आज सुधारित प्रस्ताव पाठवला जाण्याची शक्यता आहे. सायंकाळपर्यंत असा प्रस्ताव दिला जातो का आणि याबाबत प्रकाश आंबेडकर नक्की काय निर्णय घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४