शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

संजय राऊतांकडून मोठा दावा; हॉटेलमध्ये भेटलेला राष्ट्रवादीचा 'तो' नेता कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 09:07 IST

२०२४ ला मोदी जातील तेव्हा काय कराल? असा सवाल संजय राऊतांनी करताच ते खरेच जातील का? असं उत्तर राष्ट्रवादी नेत्याने दिले.

मुंबई – राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत मोठी उलथापालथ झाल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह थेट राज्य सरकारमध्ये सहभाग घेतला. आधी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि आता शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली. त्यामुळे ठाकरे-पवार यांच्या राजकीय अस्तित्वालाच धक्का देण्याचे काम भाजपाने केल्याचे बोलले जाते. मात्र यात आता संजय राऊतांच्या एका हॉटेल बॉम्बमुळे राष्ट्रवादीचा तो नेता कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

संजय राऊतांनी रोखठोक सदरात मोठा दावा केला आहे. त्यात संजय राऊत म्हणतात की, बंगळुरूसाठी विमानतळाकडे जाताना एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या एका नेत्याची भेट झाली. त्यांनी सांगितले आम्ही एनडीए बैठकीसाठी दिल्लीला चाललोय तर आम्ही बंगळुरूत बैठकीला चाललोय असं मी त्यांना म्हटलं. त्यावर आता तिथे जाऊन काय साध्य होणार असा प्रश्न या नेत्याने केला. त्यावर राऊतांनी काय होणार? ते शेवटी जनता ठरवेल. मोदी ज्यांना स्वत:चे वैयक्तिक शत्रू समजतात त्या सगळ्या देशभक्त पक्षांचे ऐक्य व्हावे, त्यांचे नेते एकत्र राहावेत अशी संपूर्ण देशाची इच्छा आहे. त्यांचा तुम्ही भ्रमनिरास केला आहात असं प्रत्युत्तर राऊतांनी दिले.

त्यावर राष्ट्रवादी नेता म्हणाला, विरोधी पक्षाचे ऐक्य कशासाठी? त्यावर राऊतांनी मोदी-शाहांचा पराभव करण्यासाठी म्हटलं. मग मोदींचा पराभव का करायचा? असा प्रश्न राष्ट्रवादी नेत्याने विचारला. त्यावर देशाची हुकुमशाही संपवून लोकशाही टिकवण्यासाठी, आज सत्तेचे संपत्तीचे, विकेंद्रीकरण पूर्णपणे संपले आहे. सत्ता आणि संपत्ती फक्त २-४ लोकांच्याच हाती एकवटली आहे. हे चित्र तुम्हाला पटते का? असा सवाल राऊतांनी केला. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याने चित्र चांगले नाही, पण आम्हाला चक्की पिसायला जायचं नाही. त्यामुळे मोदी हवेत असं उत्तर त्यांनी दिल्याचा खुलासा राऊतांनी केला.

दरम्यान, २०२४ ला मोदी जातील तेव्हा काय कराल? असा सवाल संजय राऊतांनी करताच ते खरेच जातील का? असं उत्तर राष्ट्रवादी नेत्याने दिले. संजय राऊतांनी हे संभाषण झाल्याचा दावा लेखात केला आहे. राष्ट्रवादी नेत्याच्या मनात दिल्लीच्या सत्तेविषयी भीती होती हे जाणवत आहे असं संजय राऊतांनी म्हटलं. चक्की पिसिंगपासून वाचण्यासाठी जीव वाचवण्यासाठी तिथे गेलेत, त्याचा खुलासा तुम्हाला होईल असंही संजय राऊतांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलं. मात्र संजय राऊतांनी केलेल्या दाव्यानुसार, राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्यासोबत त्यांचे संभाषण झाले अशी चर्चा आहे. कारण एनडीएच्या बैठकीत राष्ट्रवादीकडून केवळ २ नेते गेले होते. त्यात एक प्रफुल पटेल आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार. त्यामुळे या दोन पैकी कोणत्या नेत्यासोबत राऊतांचे बोलणे झाले हे आगामी काळात कळेलच.    

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा