शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

‘कोरेगाव भीमा हिंसाचार घडविण्यासाठी मोठे षडयंत्र’, ‘कम्युनिस्ट पार्टीशी असलेल्या संबंधांचा तपास करणे गरजेचे’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 6:29 AM

कोरेगाव भीमा हिंसाचार घडवण्यासाठी मोठे षड्यंत्र रचण्यात आले होते आणि त्याचे फार गंभीर परिणाम झाले, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात प्रा. आनंद तेलतुंबडे यांना दिलासा देण्यास नकार देताना नोंदविले.

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार घडवण्यासाठी मोठे षड्यंत्र रचण्यात आले होते आणि त्याचे फार गंभीर परिणाम झाले, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात प्रा. आनंद तेलतुंबडे यांना दिलासा देण्यास नकार देताना नोंदविले.कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर गुन्हा नोंदविला. मात्र अद्याप त्यांना अटक केलेली नाही. गुन्हा रद्द करण्यासाठी तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे होती. त्यांची याचिका फेटाळताना न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदविले.आपल्याला नाहक या प्रकरणात गुंतविण्यात आले आहे. कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या घटनेवेळी आपण गोव्यात होतो. तसेच पोलिसांकडे आपल्याविरुद्ध सबळ पुरावे नाहीत, असा दावा तेलतुंबडे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांनी न्यायालयात केला. त्यावर सरकारी वकिलांनी न्यायालयात एक पत्र सादर केले. तसेच पोलिसांकडे तेलतुंबडे यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असल्याचे न्यायालयाला सांगितले.‘हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. फार मोठे षड्यंत्र रचण्यात आले होते. गुन्ह्याचे स्वरूप आणि गांभीर्य लक्षात घेता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे,’ असे न्यायालयाने तेलतुंबडे यांची याचिका फेटाळताना म्हटले.‘तेलतुंबडे हे सीपीआयचे सदस्य आहेत हे सिद्ध करण्यापलीकडेही तपास केला आहे. पोलिसांनी त्यांचा या प्रकरणातील सक्रिय सहभाग स्पष्ट करणारे पुरावे जमा केले,’ असेही न्यायालयाने म्हटले. सरकारी वकिलांनी एका आरोपीने लिहिलेल्या पत्रात आनंद तेलतुंबडे यांच्या नावाचा उल्लेख असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्याचा आधार घेत न्यायालयाने म्हटले की, पत्रात उल्लेख असलेला ‘आनंद’ किंवा ‘कॉ. आनंद’ आणि आनंद तेलतुंबडे एकच आहेत, हे पटवून देण्याइतपत पोलिसांकडे पुरावे आहेत. गेल्या महिन्यात पुणे पोलिसांनी कोरेगाव भीमाप्रकरणी १० आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले.तपास यंत्रणेने केलेल्या तपासावर समाधान व्यक्त करताना न्यायालयाने म्हटले की, पुणे पोलिसांकडे तेलतुंबडे यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असून त्यांनी केलेले आरोप तथ्यहीन नाहीत. सुरुवातीला हा तपास केवळ १ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेपुरताच मर्यादित होता.मात्र आता यामध्ये सहभागी असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या इतर कामांबद्दलही तपास करण्यात येणार आहे. त्यामुळे तेलतुंबडे यांचे बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टीशी काय संबंध आहेत, याचा तपास करण्याची आवश्यकता आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :Courtन्यायालयMaharashtraमहाराष्ट्र