शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भास्कर जाधवांचा राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय फसला ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 12:23 PM

विधानसभा निवडणुकीपूर्वीच जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. जाधव यांचे राष्ट्रवादीत वजन होते. मात्र त्यांनी तरी देखील राष्ट्रवादी पक्ष सोडला. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. 

मुंबई - प्रदीर्घ काळ लागलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला असला तर खातेवाटप अद्याप झाले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत सध्या बैठकांचा जोर वाढला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली आहे. मात्र मंत्रीमंडळाच्या यादीत नाव नसणारे शिवसेना नेते नाराज असल्याचे दिसून येत आहे. 

आधीच तानाजी सावंत यांना शिवसेनेने जय महाराष्ट्र केले आहे. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले भास्कर जाधव नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. जाधव यांचे राष्ट्रवादीत वजन होते. मात्र त्यांनी तरी देखील राष्ट्रवादी पक्ष सोडला. यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. 

दरम्यान राज्यातील बदलेली राजकीय स्थिती आणि त्यामुळे तयार झालेले नवीन समिकरणे यामुळे अनेक नेत्यांची गोची झाली आहे. एकमेकांविरुद्ध लढलेल्या नेत्यांना आता सत्तेत राहून जनतेची काम करावी लागणार आहे. शिवसेनेकडून अनेक संभाव्य नेत्यांना मंत्रीमंडळातून डावलण्यात आले आहे. त्यात भास्कर जाधव यांचा नंबर लागला आहे. मात्र आपल्याला प्रवेश करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनीच शब्द दिला होता. असं जाधव यांनी सांगितले. 

विधानसभेचा मला दीर्घ अनुभव आहे. उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देखील मला मिळालेला आहे. आपल्याला सत्तेचा मोह नाही, परंतु  मंत्रीपद मिळालं नाही. त्यामुळे मी कुठ कमी पडलो या विचारात असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. एकूणच राष्ट्रवादी सोडून शिवसेनेसोबत येऊनही जाधव यांना फारसा फायदा झालेला दिसत नाही. किंबहुना राष्ट्रवादीच बरी होती, अशी चर्चा जाधव यांच्या समर्थकांमध्ये आहे.