शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

आणीबाणीनंतर आता मानधनासाठीही लढाई ; वृद्ध कार्यकर्त्यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 13:27 IST

खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आश्वासन दिल्यानंतरही काही झारीतील शुक्राचार्य मानधनासाठी पात्र असलेल्या वयोवृद्धांच्या मानधनात अडथळे आणत असल्याची कार्यकर्त्यांची भावना झाली आहे.

ठळक मुद्देकागदपत्र, पुरावे देण्याचे आवाहन ; लालफितीच्या कारभाराचा फटका आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अनेकांना त्यावेळी तुरूंगवास भोगावा लागला १ महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ तुरूंगात असणाऱ्यांना महिना १० हजार रूपये१ महिन्यापेक्षा कमी काळ तुरूंगात असलेल्यांना ५ हजार रूपये

पुणे: घरादारावर तुळशीपत्र ठेवत आणीबाणीच्या विरोधात लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांना आता वयाच्या संध्यासमयी मानधनासाठीही लढाच द्यावा लागतो आहे. गेले सलग ३ महिने शहरातील व जिल्ह्यातील मानधनासाठी पात्र असलेल्या वयोवृद्धांना मानधनच मिळालेले नाही. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आश्वासन दिल्यानंतरही काही झारीतील शुक्राचार्य यात अडथळे आणत असल्याची या वयस्कर कार्यकर्त्यांची भावना झाली आहे.  आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अनेकांना त्यावेळी तुरूंगवास भोगावा लागला. त्यातील काहीजणांनी आणीबाणी उठवल्यानंतर राजकारणात पाऊल रोवले व ते यशस्वी होत गेले. तसे जमले नाही त्यांनी आपापल्या कुटुंबांच्या चरितार्थासाठी काहीबाही करणे भाग पडले. तरीही त्यांची आर्थिक अवस्था यथातथाच राहिली. ओढग्रस्तीचा संसार कसाबसा रेटत असलेल्या अशा अनेकांना मदतीची गरज होती, मात्र त्यांच्याकडे सरकारचे लक्ष नव्हते. काही वर्षांपुर्वी आणीबाणीला विरोध करणाऱ्यांचीच सत्ता केंद्रात व राज्यातही आली. त्यानंतर लगेचच या सरकारनी आणीबाणीच्या विरोधात लढणाऱ्यांना मानधन देण्याची घोषणा केली. घोषणेनंतर लगेचच सरकारी अधिकाऱ्यांना त्याचे निकष ठरवण्याचे आदेशही देण्यात आले. १ महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ तुरूंगात असणाऱ्यांना महिना १० हजार रूपये, त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला ती हयात असेपर्यंत ५ हजार रूपये, १ महिन्यापेक्षा कमी काळ तुरूंगात असलेल्यांना ५ हजार रूपये व त्यांचे निधन झाल्यावर त्यांच्या पत्नीला अडीच हजार रूपये असे निकषही ठरले. कागदपत्र, पुरावे देण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांची छाननी करण्यात आली व पात्र व्यक्तींना मानधन सुरूही करण्यात आले. शहरातील २६८, जिल्ह्यातील ३५० जण व राज्यातील सुमारे ३ हजार ५०० जण मानधनासाठी पात्र असल्याची माहिती मिळाली. त्यांच्यापैकी अनेकांना आर्थिक मदतीची आवश्यकता असल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला.    लोकसभा निवडणूकीच्या आधी मार्च २०१९ पर्यंतचे एकदम १५ महिन्यांचे मानधन पात्र ठरलेल्या व्यक्तींना जिल्हाधिकाºयांच्या माध्यमातून देण्यात आले. रकमेचा धनादेश थेट त्यांच्या खात्यात जमा झाला. त्यानंतर मात्र आता तीन महिने झाले तरीही या पात्र असलेल्यांना मानधन मिळालेलेच नाही. वयामुळे या कार्यकर्त्यांना सरकारी कार्यालयात जाऊन चौकशी करणेही शक्य होत नाही. त्यातील अनेकांना औषधोपचारासाठी पैसे लागत असतात. काहीजणांना विचारणा केली असता त्यांना हयातीचा दाखला सादर करण्यास सांगण्यात आले. माजी महापौर दत्ता एकबोटे, पीएमटीचे माजी अध्यक्ष भीमराव पाटोळे आदींचा त्यात समावेश आहे.विधानसभा अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार यांनी हा विषय उपस्थित केला होता. त्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणाचेही मानधन अडवले, थकवले जाणार नाही. ते त्वरीत अदा केले जाईल असे जाहीर आश्वासन दिले. त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. अनेक वयोवृद्ध कार्यकर्ते या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस