शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

ही लढाई अस्तित्वाची आहे, अन्यथा हुकूमशाही प्रवृत्ती फोफावतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 5:43 AM

पृथ्वीराज चव्हाण । मतभेद दूर करावेच लागतील

- अतुल कुलकर्णी

मुंबई : काँग्रेस व राष्ट्रवादीत कटुता कधीच नव्हती, पण दोघांचे परंपरागत दृष्टिकोन वेगळे होते. त्यातून मतभेद व्हायचे. मात्र, आमच्या पराभवाने ग्रामीण भागातील नेतृत्वाचे व सहकारी चळवळीचे खच्चीकरण झाले. आताची लढाई व्यक्तींविरोधात धर्मनिरपेक्ष शक्तींच्या अस्तित्वासाठीची आहे. ती एकत्रित न लढल्यास हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपा हुकूमशाहीचे राजकारण व अराजकता निर्माण करेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

भाजपा शिवसेनेची युती झाली. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत राजकीय गणिते बदलतील, का? या प्रश्नावर ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी गेली चार वर्षे भाजपाकडून एवढा अपमान स्वीकारून युती केली. मन मारून त्यांना अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बसावे लागले. हे का केले, ते कार्यकर्त्यांना पटवून देणे त्यांना अशक्य आहे. दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड दरी निर्माण झाली आहे. जे लोक कालपर्यंत एकमेकांना दंड थोपटून दाखवित होते, ते आज लगेच एकत्र येतील, असे समजणे चुकीचे आहे.भाजपाविषयी ते म्हणाले की, हिंदुत्ववादी विचारांची राज्यात एकापेक्षा जास्त संघटना असू नयेत, अशीच भाजपाची धारणा आहे. म्हणूनच त्यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा सुरू केली. परिणामी, उद्धव ठाकरे यांनीही टोकाची भूमिका घेतली. आज देशात विरोधकांच्या महाआघाडीचे वारे जोरात वाहत आहे. उत्तर प्रदेशात आपण पराभूत होणार, हे भाजपाच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच तर भाजपाने मजबुरीतून शिवसेनेला सोबत घेतले आहे, पण घेताना शिवसेनेचे नुकसान कसे होईल याचेही डाव भाजपा खेळली आहेत. प्रत्येक निवडणूक पैशाने जिंकायची, अशी भाजपाची वृत्ती आहे. आम्ही ते करु शकत नाही.

काँग्रेस आणि राष्टÑवादीतही आलबेल नाही, कुरबुरी आहेत, याकडे लक्ष वेधता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आम्ही ४८ पैकी प्रत्येकी २० जागा वाटून घेतल्या आहेत. काही जागा मित्रपक्षाशी चर्चा करून ठरवू. भाजपाचे हुकूमशाही सरकार घालवायचे असेल तर आम्हाला अंतर्गत मतभेद दूर करावे लागतील. राष्टÑवादीला औरंगाबाद हवे आहे, आम्हाला अहमदनगर पाहिजे, सांगली, पुण्यातून कोण उभे राहायचे याची चर्चा चालू आहेच. पण स्थानिक कुरबुरी दूर सारून आम्हाला ही निवडणूक एकत्रितपणे लढावी लागेल. पूर्वी इंदिरा गांधी असताना काँग्रेसच्या हात या चिन्हावर लोक शिक्का मारायचे. आज परिस्थिती वेगळी आहे. मधल्या काही वर्षांमध्ये राजकीय पक्षांचे महत्त्व कमी होत गेले आणि नेते मोठे होत गेले. माझ्याकडे पैसा आहे, ताकद आहे, मग मी निवडून येऊ शकतो, असे म्हणणारे लोक वाढले, अशा लोकांनी अनेक पक्षांना वेठीला धरले. त्यातून पक्ष दुबळे होत गेले. भाजपानेही हेच केले. अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आरएसएसचे वर्चस्व नको आहे. त्यातून त्यांनी तुल्यबळ चेहरे पुढे करणे सुरू केले. याचा फटका त्यांनाही बसणार आहे.

मुंबई काँग्रेसमधील वादाविषयी ते म्हणाले की, घर म्हटले की वाद होतातच. पण पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे त्यात लक्ष घालतील आणि मुंबई अध्यक्ष निवडणुकीला उभे राहिल्यास त्या काळात कार्याध्यक्ष म्हणून अन्य कोणाला तरी जबाबदारी दिली जाईल.पूर्वी आम्ही जसे होतो, तशी आता भाजपाची अवस्था झाली आहे. स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांना दूर सारून आमच्याकडून आयात केलेल्यांच्या मागे भाजपा पैशाची ताकद लावून त्यांना विजयी करताना दिसली आहे. त्यातून भाजपाने आरएसएसच्या कार्यकर्त्यांवरही अन्याय चालविला आहे.प्रकाश आंबेडकरांविषयी ते म्हणाले...मला त्यांची भूमिका प्रामाणिकपणाची वाटत नाही. त्यांनी मतविभाजनाचा विडाच उचलेला आहे. सत्ताधारी भाजपाच्या फायद्याची खेळी ते खेळत आहेत. म्हणून तर मुंबईतील शिवाजी पार्कवर त्यांच्या व ओवेसींच्या सभेसाठी परवानगी दिली जाते आणि राहुल गांधी यांच्या सभेसाठी ती नाकारली जाते. यातच सगळे काही आले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा