शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ५०० ते १००० रुपयांत बांगलादेशी बनताहेत भारतीय; ११ महिन्यांत १५६ जण हद्दपार; ६ महिलांचे प्रत्यार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 07:19 IST

गेल्या अकरा महिन्यांत मुंबईतून अशा १५६ बांगलादेशींना हद्दपार करण्यात आले, तर ६ महिलांचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. 

मुंबई : बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. अशात तेथील गरिबी आणि उपासमारीला कंटाळून अनेक बांगलादेशी घुसखोर अवैध मार्गाने आंतरराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडून भारतात येत आहे, तसेच ते अवघ्या पाचशे ते दोन हजारांत ते भारतीय ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे बनवत असल्याचे चौकशीत समोर आले. गेल्या अकरा महिन्यांत मुंबईतून अशा १५६ बांगलादेशींना हद्दपार करण्यात आले, तर ६ महिलांचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. 

राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गेल्या आठवड्यात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि सोलापूर, नाशिक जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून महिनाभरात ४३ बांगलादेशींना अटक केली. भारतातील वास्तव्यासाठी या आरोपींनी बनावट कागदपत्रांआधारे आधार कार्ड, पॅन कार्ड बनवून घेतल्याचे उघड होते. विशेष शाखा एकच्या आय शाखेकडून २०२४ मध्ये सजामुक्त बांगलादेशी नागरिकांवरील कारवाई अहवालानुसार, अकरा महिन्यांत १५६ जणांवर हद्दपारची कारवाई केली आहे. यापैकी फक्त सहा बांगलादेशीचे प्रत्यार्पण करण्यात आले. यापैकी काही जण पाचशे ते दोन हजारांत भारतीय कागदपत्रे मिळवल्याचे तपासात समोर येत आहे. गेल्या वर्षी एकट्या मुंबईतून ३६८ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी २०२२ मध्ये मुंबईतून १४७ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. 

संपूर्ण साखळीविरोधात कारवाईबांगलादेशी नागरिकांना अटक केल्यानंतर त्यांना मायदेशी पाठण्याच्या प्रक्रियेला अनेक वर्षे लागतात. त्या काळात घुसखोर बांगलादेशी नागरिक विविध सरकारी योजनांचा फायदा घेतात. त्यांच्या इतर बांगलादेशी घुसखोरांना भारतात स्थायिक करण्याचे बेकायदेशीर काम ते करतात. त्यामुळे घुसखोरांना कागदपत्रे व मदत पुरवणाऱ्या संपूर्ण साखळीविरोधातच कारवाई करण्यास एटीएसने सुरुवात केली आहे. 

त्या अंतर्गत संशयित बांगलादेशी नागरिकांची बँक खाते बंद करण्याबाबत बँकांना नोटीस पाठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे, तसेच शिधापत्रिका, चालक परवाने रद्द करण्याबाबतही संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला जाताे.

- गेल्या तीन वर्षांत ६९६ बांगलादेशी नागरिकांना अटक- २२२  बांगलादेशी मायदेशी रिटर्न...

भिवंडीत वाढतोय वावर गेल्या ११ महिन्यांमध्ये ठाणे शहर आयुक्तालयाने ५० हून अधिक बांगलादेशींना जेरबंद केले. भिवंडीमध्ये उत्तर प्रदेश, बिहारचाही मुस्लिम वर्ग असल्यामुळे त्यांच्यात बांगलादेशी सहज मिसळतात. त्यामुळे बांगलादेशींना नेमके शोधून काढून त्यांच्यावर कारवाईचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBangladeshबांगलादेशIndiaभारतinfiltrationघुसखोरी