शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

मध्य वैतरणा प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

By admin | Updated: August 24, 2016 20:58 IST

शिवसेना व भाजपा युतीमध्ये गेल्या वर्षभरात असंख्य मतभेद असले तरी एका गोष्टीवर युतीचे एकमत झाले आहे़ मध्य वैतरणा प्रकल्पाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24 - शिवसेना व भाजपा युतीमध्ये गेल्या वर्षभरात असंख्य मतभेद असले तरी एका गोष्टीवर युतीचे एकमत झाले आहे़ मध्य वैतरणा प्रकल्पाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ १ सप्टेंबर रोजी या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येणार आहेत़ त्यामुळे निवडणुकीपूर्वी युतीबाबतचे संकेत स्पष्ट होण्याची शक्यता आहे़

मध्य वैतरणा धरणाला नानाशंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी काही वर्षांपूर्वी केली होती़ मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधानंतर या धरणाला त्यांचे नाव देण्याचे शिवसेनेने ठरविले़ तशी मागणीही गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केली होती़ परंतु गेल्या वर्षभरात शिवसेना आणि भाजपाच्या मैत्रीत फुट पडून उभय पक्षांनी असहकार पुकारला़ त्यामुळे शिवसेनेचा हे स्वप्न भाजपा पूर्ण होऊ देईल का, याबाबत शंका व्यक्त होत होती़

या नामकरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळही मिळत नसल्याने हा संशय आणखी बळावला होता़ परंतु अखेर १ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे़ या कार्यक्रमात शिवसेना व भाजपाचे दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत़ त्यामुळे पालिकेच्या आगामी निवडणुकीत उभय पक्षांची काय भूमिका असेल, याचे संकेत मिळण्याची शक्यता आहे़ मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ४५५ दशलक्ष लीटरची वाढ करणारे मध्य वैतरणा धरण २०१२ मध्ये पूर्ण झाले़

रोलर कॉम्पेक्टेड काँक्रिट रोलर (आरसीसी) पद्धतीने बांधण्यात आलेले महाराष्ट्रातील हे पहिले धरण आहे़ १९९३ मध्ये मध्य वैतरणा प्रकल्प आखण्यात आला़ त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील मोखाडा येथे हे धरण बांधण्यात येणार होते़ मात्र या प्रकल्पासाठी पावणेदोन लाख वृक्षांची कत्तल करावी लागणार असल्याने पर्यावरण मंत्रालयाने आक्षेप घेतला होता़

अखेर बीड जिल्ह्यात तेवढ्याच वृक्षांचे पुर्नरोपण केल्यानंतर २००७ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली़ चार वर्षांत या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ विलंबाने वाढविला खर्च १९९३ मध्ये चितळे समितीने मध्य वैतरणा धरणाची शिफारस केली़ २००९ मध्ये धरणाचे काम सुरु झाले़ जवहारलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुनर्निमाण अभियान अंतर्गत या प्रकल्पाला निम्मा निधी मिळाला़ या प्रकल्पाचा खर्च १२०० कोटी अपेक्षित होता़

मात्र अनेक वर्षांच्या दिरंगाईमुळे हा खर्च दोन हजार कोटींवर पोहोचला़ धरणाचे वैशिष्ट जलदगतीने पूर्ण होणारे जगातील हे ९ वे आरसीसी धरण आहे़ या धरणाची उंची १०२़४ मीटर एवढी आहे़ भाकरा नंगाल धरणानंतर आरसीसी पद्धतीने बांधण्यात आलेले मध्य वैतरणा हे देशातील दुसरे मोठे धरण आहे़