शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली" - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 11:06 IST

Sharad Pawar Sanjay Raut Interview : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवारांना 'या सर्व परिस्थितीत कधी बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते का?' असा प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मुंबई - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. देशात कोरोनाचे जवळपास आठ लाख रुग्ण आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. (Sharad Pawar Sanjay Raut Interview)

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवारांना 'या सर्व परिस्थितीत कधी बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते का?' असा प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात विशेषत: पहिले दोन महिने बाळासाहेब ठाकरेंची आठवण आल्याचं म्हटलं आहे. "बाळासाहेबांची कामाची पद्धत तुम्हाला माहीत आहे. बाळासाहेबांनी देखील काही दिवस घरात घालवले मात्र ते घालवत असताना सहकाऱ्यांना बरोबर ठेवून त्यांना प्रोत्साहित करून परिस्थितीला कसं तोंड द्यायचं हे बाळासाहेबांनी नक्कीच शिकवलेलं होतं" असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

"लॉकडाऊनच्या काळात माझ्यासारख्याला या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण यासाठी होती की आपण घराच्या बाहेर तर पडायचं नाही मात्र ज्या दिशेने आपल्याला जायचंय त्या दिशेने जायच्या प्रवासाची तयारी केली पाहिजे आणि ते बाळासाहेब करायचे त्यामुळे त्याची आठवण या काळात अधिक झाली" असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करावा लागला. केंद्रीय पातळीवर लॉकडाऊनचा निर्णय होण्याआधी महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा झाली. मात्र या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आमची भूमिका वेगळी नाही. आमच्यामध्ये मतभेद नाहीत, असं शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले, इथून पुढे प्रत्येक नागरिकाला तुम्हाला आणि मला कोरोनासह जगायच्या संबंधीची तयारी असली पाहिजे. त्यामुळे कोरोना हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होतोय, अशी भूमिका तज्ज्ञांकडून मांडली गेली आहे. ती गृहीत धरून पुढे जाण्याच्या संबंधीचा विचार करावा लागेल. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा ट्रेंड खाली जाईल. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तो नॉर्मलवरती येईल, पण याचा अर्थ तो कायमचाच संपला असा घेण्याचं कारण नाही. तो रिव्हर्सही होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या काळात आपल्याला कोरोनाची काळजी घ्यावी लागेल, असंही शरद पवारांनी संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस