शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

“बोलवा रे त्या सगळ्यांना!”; बालाजी तांबेंच्या तक्रारीवर बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती हातात काठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 17:18 IST

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही बालाजी तांबेंचा गाढा स्नेह होता.

मुंबई: आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मागील आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल, संजय आणि सूना व नातवंडे असा परिवार आहे. राजकारण, समाजकारण, उद्योगजगत आणि सिनेविश्व अशा सर्वच क्षेत्रांमध्ये बालाजी तांबे यांचा मित्र परिवार होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही बालाजी तांबेंचा गाढा स्नेह होता. एका मुलाखतीत त्यांनी एक आठवण सांगितली होती. (balaji tambe passed away know memories of his friendship with balasaheb thackeray)

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. अलीकडेच बालाजी तांबे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीची एक आठवण वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती. 

बाळासाहेबांकडे केली होती तक्रार

बालाजी तांबे त्या काळी एमटीडीसीच्या एका बंगल्यात भाड्याने राहात होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी बालाजी तांबेंच्या बंगल्यावर मुक्काम केला. बाळासाहेब ठाकरे बालाजी तांबेंच्या बंगल्यावर राहाण्यासाठी आले असताना त्यांना सगळीकडे अस्वच्छता दिसली. बंगल्याच्या आजूबाजूला कचरापट्टी झाली होती. याबाबत त्यांनी बालाजी तांबे यांना विचारणा केली होती. तेव्हा बालाजी तांबेंनी आपली तक्रार त्यांच्यापुढे मांडली. 

पण कुणी काही ऐकतच नाही

मी त्यांना सगळे सांगितले. जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मी आहे, आम्ही स्वच्छतेवरच सगळी लक्ष्मी कमावली आहे वगैरे. पण कुणी काही ऐकतच नाही, असे बालाजी तांबेंनी बाळासाहेब ठाकरेंना सांगितले. बाळासाहेबांनी हे सगळे ऐकले आणि तडक एक काठीच हातात घेतली आणि फर्मान सोडले, बोलवा रे त्या सगळ्यांना. बाळासाहेबांचा पवित्रा पाहून बालाजी तांबेंनी विचारले, बाळासाहेब, तुमची युनियन आहे का इथे? त्यावर बाळासाहेब उत्तरले, माझे युनियन नाही. पण मी दाखवतो युनियनशिवाय कशी कामे होतात ते! एवढे बोलून बाळासाहेबांनी तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांची झडती घ्यायला सुरुवात केली. त्यांना दरडावले, की लगेच सगळीकडे स्वच्छता करा. मी जाईपर्यंत इथे सगळे हिरवे दिसले नाही, तर या काठीने एकेकाला दाखवतो, अशी आठवण बालाजी तांबे यांनी सांगितली होती. 

दरम्यान, बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते. तब्बल पाच दशके त्यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा प्रचार व प्रसार केला. आयुर्वेद केवळ राज्य किंवा देशभरापुरते मर्यादित न ठेवला त्यांनी जगभरात प्रसार केला आणि त्याचे महत्व पटवून दिले.  

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेAyurvedic Home Remediesघरगुती उपायMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे