शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

“बोलवा रे त्या सगळ्यांना!”; बालाजी तांबेंच्या तक्रारीवर बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती हातात काठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 17:18 IST

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही बालाजी तांबेंचा गाढा स्नेह होता.

मुंबई: आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मागील आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल, संजय आणि सूना व नातवंडे असा परिवार आहे. राजकारण, समाजकारण, उद्योगजगत आणि सिनेविश्व अशा सर्वच क्षेत्रांमध्ये बालाजी तांबे यांचा मित्र परिवार होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही बालाजी तांबेंचा गाढा स्नेह होता. एका मुलाखतीत त्यांनी एक आठवण सांगितली होती. (balaji tambe passed away know memories of his friendship with balasaheb thackeray)

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. अलीकडेच बालाजी तांबे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीची एक आठवण वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती. 

बाळासाहेबांकडे केली होती तक्रार

बालाजी तांबे त्या काळी एमटीडीसीच्या एका बंगल्यात भाड्याने राहात होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी बालाजी तांबेंच्या बंगल्यावर मुक्काम केला. बाळासाहेब ठाकरे बालाजी तांबेंच्या बंगल्यावर राहाण्यासाठी आले असताना त्यांना सगळीकडे अस्वच्छता दिसली. बंगल्याच्या आजूबाजूला कचरापट्टी झाली होती. याबाबत त्यांनी बालाजी तांबे यांना विचारणा केली होती. तेव्हा बालाजी तांबेंनी आपली तक्रार त्यांच्यापुढे मांडली. 

पण कुणी काही ऐकतच नाही

मी त्यांना सगळे सांगितले. जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मी आहे, आम्ही स्वच्छतेवरच सगळी लक्ष्मी कमावली आहे वगैरे. पण कुणी काही ऐकतच नाही, असे बालाजी तांबेंनी बाळासाहेब ठाकरेंना सांगितले. बाळासाहेबांनी हे सगळे ऐकले आणि तडक एक काठीच हातात घेतली आणि फर्मान सोडले, बोलवा रे त्या सगळ्यांना. बाळासाहेबांचा पवित्रा पाहून बालाजी तांबेंनी विचारले, बाळासाहेब, तुमची युनियन आहे का इथे? त्यावर बाळासाहेब उत्तरले, माझे युनियन नाही. पण मी दाखवतो युनियनशिवाय कशी कामे होतात ते! एवढे बोलून बाळासाहेबांनी तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांची झडती घ्यायला सुरुवात केली. त्यांना दरडावले, की लगेच सगळीकडे स्वच्छता करा. मी जाईपर्यंत इथे सगळे हिरवे दिसले नाही, तर या काठीने एकेकाला दाखवतो, अशी आठवण बालाजी तांबे यांनी सांगितली होती. 

दरम्यान, बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते. तब्बल पाच दशके त्यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा प्रचार व प्रसार केला. आयुर्वेद केवळ राज्य किंवा देशभरापुरते मर्यादित न ठेवला त्यांनी जगभरात प्रसार केला आणि त्याचे महत्व पटवून दिले.  

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेAyurvedic Home Remediesघरगुती उपायMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे