शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

"मनोज जरांगेंनी टोकाची भूमिका घेऊ नये, आंदोलनाची दिशा बदलली तर..."; बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 14:31 IST

बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टोकाची भूमिका घेऊ नये असं म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मनोज जरांगेंच्या आरोपांवर उत्तर दिलं. यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत येत्या दोन तासांत पुढील निर्णय घेणार असून फडणवीस यांना पश्चात्ताप करण्याची वेळ येईल, असं म्हटलं आहे. 

बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. टोकाची भूमिका घेऊ नये असं म्हटलं आहे. तसेच आंदोलनाला जाणीवपूर्वक वेगळं वळण लागावं यासाठी काही लोक तसं करत आहेत. पण त्याला आपण बळी पडू नये असंही म्हटलं आहे. "मनोज जरांगे-पाटील यांनी मेहनत घेतली आहे. प्रामाणिकपणे आंदोलन सुरू केलं आहे. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. आंदोलनाला जाणीवपूर्वक वेगळं वळण लागावं यासाठी काही लोक तसं करत आहेत. पण त्याला आपण बळी पडू नये."

"एका व्यक्तीवर आरोप करून आंदोलनाची दिशा बदलली तर ते चुकीचं होईल. आम्ही सोबत आहोत. पण त्यांनी एकदम एवढ्या टोकाची भूमिका घेऊ नये कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे. याला वेगळं वळण लागावं यासाठी काही शक्ती काम करत आहेत. त्या शक्तींना बळी पडू नये. घेतलेली टोकाची भूमिका जरांगे पाटील यांनी थांबवावी. बारसकर आणि प्रहारचा विषय संपलेला आहे" असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. 

जनता कामं केल्यावर आदर देते. देवेंद्र फडणवीसांनी असले धंदे बंद करावेत. देवेंद्र फडणवीसांना सुट्टी नाही. देवेंद्र फडणवीसांना आता हरवायचे आहे. त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. राज्यासह देशात त्यांना अडचणीत आणू. जनतेचा अंत पाहू नये. संचारबंदी लावून सरकार चालवण्यात कसली मर्दानगी आहे, असा सवाल करत, त्यांच्यात दम नाही, ते पोलिसांच्या आडूनच कामे करणार, असे अनेक गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केले. त्यानंतर अंतरवाली सराटीत परतण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे. तसेच तिथे जाऊन एक बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ, असंही स्पष्ट केलं आहे. आंदोलकांनी शांत राहावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण