शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

"मनोज जरांगेंनी टोकाची भूमिका घेऊ नये, आंदोलनाची दिशा बदलली तर..."; बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 14:31 IST

बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टोकाची भूमिका घेऊ नये असं म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मनोज जरांगेंच्या आरोपांवर उत्तर दिलं. यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत येत्या दोन तासांत पुढील निर्णय घेणार असून फडणवीस यांना पश्चात्ताप करण्याची वेळ येईल, असं म्हटलं आहे. 

बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. टोकाची भूमिका घेऊ नये असं म्हटलं आहे. तसेच आंदोलनाला जाणीवपूर्वक वेगळं वळण लागावं यासाठी काही लोक तसं करत आहेत. पण त्याला आपण बळी पडू नये असंही म्हटलं आहे. "मनोज जरांगे-पाटील यांनी मेहनत घेतली आहे. प्रामाणिकपणे आंदोलन सुरू केलं आहे. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. आंदोलनाला जाणीवपूर्वक वेगळं वळण लागावं यासाठी काही लोक तसं करत आहेत. पण त्याला आपण बळी पडू नये."

"एका व्यक्तीवर आरोप करून आंदोलनाची दिशा बदलली तर ते चुकीचं होईल. आम्ही सोबत आहोत. पण त्यांनी एकदम एवढ्या टोकाची भूमिका घेऊ नये कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे. याला वेगळं वळण लागावं यासाठी काही शक्ती काम करत आहेत. त्या शक्तींना बळी पडू नये. घेतलेली टोकाची भूमिका जरांगे पाटील यांनी थांबवावी. बारसकर आणि प्रहारचा विषय संपलेला आहे" असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. 

जनता कामं केल्यावर आदर देते. देवेंद्र फडणवीसांनी असले धंदे बंद करावेत. देवेंद्र फडणवीसांना सुट्टी नाही. देवेंद्र फडणवीसांना आता हरवायचे आहे. त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. राज्यासह देशात त्यांना अडचणीत आणू. जनतेचा अंत पाहू नये. संचारबंदी लावून सरकार चालवण्यात कसली मर्दानगी आहे, असा सवाल करत, त्यांच्यात दम नाही, ते पोलिसांच्या आडूनच कामे करणार, असे अनेक गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केले. त्यानंतर अंतरवाली सराटीत परतण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे. तसेच तिथे जाऊन एक बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ, असंही स्पष्ट केलं आहे. आंदोलकांनी शांत राहावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण