शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वादग्रस्त वक्तव्य टाळा; अजित पवारांची नेत्यांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 16:39 IST

अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी धरणातील पाण्यावरून केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील सभेत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेनंतर अजित पवार कमालीचे सावध झाल्याचे चित्र आहे.

मुंबई - काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तसेच नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणे टाळावे. भाजप आणि शिवसेनेचे वाचाळवीर ज्या पद्धतीने बोलतात, तसं चुकूनही बोलू नका, बोलता येत नसेल तर शांत रहा, अशी तंबी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिली. बारामती मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.

अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी धरणातील पाण्यावरून केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील सभेत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेनंतर अजित पवार कमालीचे सावध झाल्याचे चित्र आहे. पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तोलून मापून बोलावे. बोलता येत नसेल तर शांत रहावे. एक वाक्य चुकलं तर सोशल मीडियावर ते गाजतं, त्यामुळे काळजी घ्या असंही अजित पवार यांनी म्हटले.

नागपूरच्या सभेत मित्र पक्षाच्या नेत्याने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याबद्दल मी माफी मागतो. हे मला अजिबात आवडले नाही. आपल्या नेत्यांना देखील हे आवडणार नाही. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना बगल देणारी ही बाब असल्याचं अजित पवार म्हणाले.

यावेळी अजित पवार यांनी भाजपवर कडाडून टीका केली. मागील पाच वर्षांत केवळ दोन लोकांनी सरकार चालवले. खुद्द नितीन गडकरी सांगतात, सरकारमध्ये माझं कोणीच ऐकत नाही. भाजपमधून ज्येष्ठांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. हे पाहून सुषमा स्वराज खुद्द म्हणाल्या मला लढायचचं नाही. उमा भारतींना डावलले, शत्रुघ्न सिन्हांनी पक्ष सोडला, हे सर्व का झालं याचा विचार करा, असंही अजित पवार यांनी म्हटले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस