शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

वादग्रस्त वक्तव्य टाळा; अजित पवारांची नेत्यांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 16:39 IST

अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी धरणातील पाण्यावरून केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील सभेत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेनंतर अजित पवार कमालीचे सावध झाल्याचे चित्र आहे.

मुंबई - काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तसेच नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणे टाळावे. भाजप आणि शिवसेनेचे वाचाळवीर ज्या पद्धतीने बोलतात, तसं चुकूनही बोलू नका, बोलता येत नसेल तर शांत रहा, अशी तंबी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिली. बारामती मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.

अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी धरणातील पाण्यावरून केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील सभेत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेनंतर अजित पवार कमालीचे सावध झाल्याचे चित्र आहे. पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तोलून मापून बोलावे. बोलता येत नसेल तर शांत रहावे. एक वाक्य चुकलं तर सोशल मीडियावर ते गाजतं, त्यामुळे काळजी घ्या असंही अजित पवार यांनी म्हटले.

नागपूरच्या सभेत मित्र पक्षाच्या नेत्याने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याबद्दल मी माफी मागतो. हे मला अजिबात आवडले नाही. आपल्या नेत्यांना देखील हे आवडणार नाही. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना बगल देणारी ही बाब असल्याचं अजित पवार म्हणाले.

यावेळी अजित पवार यांनी भाजपवर कडाडून टीका केली. मागील पाच वर्षांत केवळ दोन लोकांनी सरकार चालवले. खुद्द नितीन गडकरी सांगतात, सरकारमध्ये माझं कोणीच ऐकत नाही. भाजपमधून ज्येष्ठांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. हे पाहून सुषमा स्वराज खुद्द म्हणाल्या मला लढायचचं नाही. उमा भारतींना डावलले, शत्रुघ्न सिन्हांनी पक्ष सोडला, हे सर्व का झालं याचा विचार करा, असंही अजित पवार यांनी म्हटले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस