शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

Ayodhya Verdict: लोकशाहीच्या मूल्यांना मजबूत करणारा निकाल - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 15:04 IST

Ayodhya Result : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत

मुंबई: अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या ऐतिहासिक निकालाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे लोकशाहीची मूल्यं आणखी मजबूत होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे वेगळ्या चष्मातून पाहू नका. यामुळे कोणचाही विजय अथवा पराजय नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना मांडल्या. न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे लोकशाही मूल्यं अधिक मजबूत होतील. जवळपास सर्वांनीच या निकालाचं उत्साहात स्वागत केलं आहे. मुंबईसह राज्यभरात अतिशय चांगलं वातावरण पाहायला मिळत आहे. याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार मानतो. यापुढेही राज्यात शांतता कायम राहील, असा विश्वास वाटतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राहील आणि येत्या काही दिवसात येऊ घातलेले विविध धर्मांचे सण अतिशय उत्साहात साजरे होतील, अशी आशा फडणवीसांनी व्यक्त केली. 'सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मोदींनी भारतभक्तीचा उल्लेख केला. भारतभक्तीचा हाच भाव देशात दिसतो आहे. हाच खरा सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आहे. नव्या भारताच्या उभारणीसाठी आपण सगळे एकजुटीनं प्रयत्न करू,' असं आवाहन त्यांनी केलं. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल सुनावला. अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर मोक्याची पर्यायी जागा द्यावी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचा निर्णय न्यायालयानं दिला. तीन महिन्यात राम मंदिराच्या उभारणीसाठी योजना आखा. एक न्यास स्थापन करुन मंदिर निर्माणाचा आराखडा द्या, अशा सूचना न्यायालयानं दिल्या आहेत.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRam Mandirराम मंदिरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय