शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

औरंगाबादेत विधानसभेलाही मुलभूत प्रश्न ऐरणीवर; शिवसेनेची डोकेदुखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 3:17 PM

आदेश बांदेकर यांच्या नेतृत्वात औरंगाबादेत माउली संवाद हा महिलांसाठींचा कार्यक्रम घेण्यात आला. परंतु, या माउली संवादमध्ये महिलांनी पुन्हा एकदा मुलभूत प्रश्नांवरून अर्थात, पाणी, कचरा आणि रस्ते यावरून शिवसेना नेत्यांना धारेवर धरल्याचे समोर आले आहे.

मुंबई - राज्यात निवडणूक लोकसभेची असो वा विधानसभेची प्रत्येकवेळी गाजतात ते औरंगाबादमधील मुलभूत प्रश्नच. लोकसभा निवडणुकीच्या वेळी औरंगाबादधील कचरा प्रश्न चांगलाच गाजला होता. किंबहुना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना याच समस्येमुळे धक्का बसला आहे. त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांमध्ये पाणी, कचरा, रस्ते हेच प्रश्न गाजले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील हेच प्रश्न शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

औरंगाबादेत चंद्रकांत खैरे सतत 15 वर्षे खासदार होते. तर महानगर पालिकेत देखील अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी येथील कचरा प्रश्नाने भीषण रूप धारण केले होते. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य नियोजन न केल्यामुळे शहरभर कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष होता.

औरंगाबाद जिल्ह्यात पाण्याची समस्या देखील भीषण झाली आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण जिल्ह्यात असूनही जिल्ह्यात उन्हाळ्यात पाणी समस्या निर्माण होते. त्यामुळे मोठी नाराजी आहे. तर रस्त्यांच्या बाबतीतही लोकांना त्रास सहन करावा लागला होता. या समस्यांना डोळ्यासमोर ठेवून औरंगाबादकरांनी जिल्ह्यात लोकसभेला परिवर्तन केले. आता देखील तेच प्रश्न पुन्हा ऐरणीवर येत आहेत.

विविध पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. त्यात शिवसेनेचे नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांच्या नेतृत्वात औरंगाबादेत माउली संवाद हा महिलांसाठींचा कार्यक्रम घेण्यात आला. परंतु, या माउली संवादमध्ये महिलांनी पुन्हा एकदा मुलभूत प्रश्नांवरून अर्थात, पाणी, कचरा आणि रस्ते यावरून शिवसेना नेत्यांना धारेवर धरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विधानसभेला देखील पुन्हा एकदा मुलभूत प्रश्न गाजण्याची शक्यता असून सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपसाठी ही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.