शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

खोटे फोटो प्रसारित करून चित्रा वाघ यांना बदनाम करण्याचा प्रयत्न, मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 26, 2021 21:10 IST

ज्यांच्यासोबत आपण फोटो काढला, त्यांच्यासोबत आपण संभाषण करतो. त्यांना सोन्याची अंगठी देतो, पितळेची नाही, तांब्याची नाही, तेव्हा संशोय निर्माण होतो. (Sudhir Mungantiwar on Sanjay Rathod)

ठळक मुद्देराज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. संजय राठोडांसोबत चित्रा वाघ यांचे मॉर्फ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात अन्याया विरोधात आवाज उठवणं गुन्हा झालाय का? - चित्रा वाघ

मुंबई - राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी अक्षरशः राण उठवले आहे. त्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव घेत थेट आरोप करत आहेत. मात्र, आता राठोडांसोबत त्यांचेच मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. यावर बोलताना, चित्रा वाघ आवाज उचलत असल्याने सरकार त्यांना अशा प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उद्धव सरकारवर केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. (Attempt to defame Chitra Wagh by broadcasting fake photos, Mungantiwar's serious allegations against state government.)

"चित्राताई वाघ आवाज उचलत आहेत म्हणून सरकार त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना अशा प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना बदनाम करण्याच्या दृष्टीने, असे खोटे-नाटे चित्र प्रसारित केले जात असतील तर, तो महाराष्ट्राचा अवमान आहे. पोलीस यंत्रणेने याची चौकशी करून दोशींवर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे," असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 

...त्यांना आपण सोन्याची अंगठी दोतो तेव्हा संशय निर्माण होतो - ज्यांच्यासोबत आपण फोटो काढला, त्यांच्यासोबत आपण संभाषण करतो. त्यांना सोन्याची अंगठी देतो, पितळेची नाही, तांब्याची नाही, तेव्हा संशय निर्माण होतो. हा संशय चौकशीच्या माध्यमाने दूर करायला हवा. जर निष्पाप असेल तर कारवाई होता कामा नये आणि दोशी असेल तर सुटता कामा नये. त्यामुळे चौकशी होईपर्यंत संजय राठोड यांनी राजीनामा द्यायला हवा, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

मुनगंटीवारांनी ठाकरे सरकारला समजावली शिवशाही - यावेळी मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे सरकारला शिवशाहीही संजावली. मुनगंटीवार म्हणाले, "छत्रपती शिवजी महाराजांचा आम्ही मंत्रालयात फटो लावतो अथवा विधान भवनात जाताना आम्ही शिवरायांचं दर्शन घेऊन विधानभवनात प्रवेश करतो, ते यासाठी, की महाराजांना आम्ही विश्वास देतो, की तुमच्या या रयतेच्या राज्यात तुम्ही जरी आमच्यात नसले, तरी तुमचा विचार आम्हाला दिशा देतो. कोणत्याही महिलेवर अन्यात, अनाचार झाला, तर रांझ्याच्या पाटलाची जी दशा झाली, तीच आम्ही तुमच्या या रयतेच्या राज्यात केल्याशिवाय राहणार नाही, ही भावना त्या मागे असते.

राज्यात अन्याया विरोधात आवाज उठवणं गुन्हा झालाय का?व्हायरल झालेल्या या मॉर्फ फोटोत चित्रा वाघ आणि संजय राठोड अगदी जवळ उभे असल्याचे दिसत आहेत. यासंदर्भात एका स्थानिक वृत्त वाहिनीशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, "महाराष्ट्रात अन्यायाविरोधात आवाज उठवणे आता गुन्हा झाला आहे का? असे मला विचारायचे आहे. जे काम पोलिसांचे आहे, ते पोलिसांनी केले असते, जे काम सरकारचे आहे, ते काम सरकारने केले असते. तर आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची काय गरज होती? स्वतः काही करायचे नाही आणि अशा पद्धतीने फौज उभी करायची आणि हे तुम्ही बघितले मॉर्फ केलेले फोटो काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

...तोपर्यंत सहन करावेच लागणार -वाघ म्हणाल्या, मला सातत्याने हॅरेसमेंटचे फोन येत आहेत. त्याचे स्क्रीन शॉर्ट काढून मी डीजींसह सर्वांना पाठवत आहे. मी मुंबईच्या बाहेर जात असल्याने, जोपर्यंत मी गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत कारवाई होणार नाही. मग तोपर्यंत मी हे सगळं सहन करायचं का? आणि माझा गुन्हा काय, तर जिथे अन्याय झाला तिथे आवाज उठवत आहे. हा माझा गुन्हा आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला. 

 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेChitra Waghचित्रा वाघSanjay Rathodसंजय राठोडBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPooja Chavanपूजा चव्हाण