शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांकडे एटीएसकडून चौकशी, आतापर्यंत १०० हून अधिक जणांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 06:52 IST

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात आतापर्यंत एटीएसकड़ून  १०० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. एटीएसच्या विविध पथकांनी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हैदराबाद आणि नवी दिल्ली येथील यंत्रणांशी माहितीची देवाणघेवाण केली. दरम्यान, एटीएसने व्यावसायिक मनसुख हिरेन यांचे  शवविच्छेदन करणाऱ्या तीन तज्ज्ञांची चौकशी केली. प्राथमिक अहवालात मनसुख यांची हत्या करून त्यांचा मृतदेह खाडीत फेकण्यात आल्याचे सांगितले. अशात त्यावेळी फुफ्फुसात पाण्याचे प्रमाणही कमी असल्याचे नमूद करण्यात आले होते. मृत्यूपूर्वी 

मुंबई: मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मुंबई आणि ठाण्यातील दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे चौकशी केली. यातील एक अधिकारी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या आधी आणि नंतर सचिन वाझे यांच्यासोबत असल्याची माहिती समोर येत आहे.मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात आतापर्यंत एटीएसकड़ून  १०० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. एटीएसच्या विविध पथकांनी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हैदराबाद आणि नवी दिल्ली येथील यंत्रणांशी माहितीची देवाणघेवाण केली. दरम्यान, एटीएसने व्यावसायिक मनसुख हिरेन यांचे  शवविच्छेदन करणाऱ्या तीन तज्ज्ञांची चौकशी केली. प्राथमिक अहवालात मनसुख यांची हत्या करून त्यांचा मृतदेह खाडीत फेकण्यात आल्याचे सांगितले. अशात त्यावेळी फुफ्फुसात पाण्याचे प्रमाणही कमी असल्याचे नमूद करण्यात आले होते. मृत्यूपूर्वी मनसुख यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्याचे नमूद करण्यात आले होते.

पुढे एटीएसने डायटम चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल आणि शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या माहितीत विरोधाभास आढळून आला. मनसुख पाण्यात पडले तेव्हा ते जिवंत किंवा बेशुद्धावस्थेत होते, अशी माहिती यातून समोर आली. हा अहवाल एटीएस हरियाणा येथील प्रयोगशाळेत अभिप्रायासाठी पाठवणार आहे. त्यानुसार, त्यांचा अभिप्राय येताच पुढील भूमिका घेण्यात येणार असल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

    - आतापर्यंतच्या तपासात ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ११चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यामुळे दोघांकडे चौकशी करण्यात आली. त्यांचा यात काही सहभाग आहे का? या दिशेनेही चौकशी करण्यात आली. 

- यापैकी एक अधिकारी ३ ते ५ मार्च दरम्यान गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्षात (सीआययू) असल्याचे समजते. त्याबाबतही यावेळी चौकशी करण्यात आली. याच काळात ४ मार्च रोजी मनसुख कांदिवली कक्षाच्या तावडे नावाच्या व्यक्तिला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. - त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. कुटुंबीयांनी त्यांची बरीच शाेधाशाेध करुनही ते सापडले नाहीत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक त्यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर तपासात हिरेन ज्यांना भेटायला गेलाे हाेते त्या कांदिवली कक्षात तावडे नावाचा अधिकारी नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांकड़ून देण्यात आले होते. त्यामुळे संबंधित अधिकारी येथे क़ाय करत होता?  त्यांचा यात काही सहभाग आहे का? याबाबतही चौकशी हाेईल. - याप्रकरणी आतापर्यंत दाेघांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत. गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते, असेही एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.  

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाPoliceपोलिसMukesh Ambaniमुकेश अंबानीMansukh Hirenमनसुख हिरणMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी