शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मुंबई, ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांकडे एटीएसकडून चौकशी, आतापर्यंत १०० हून अधिक जणांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 06:52 IST

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात आतापर्यंत एटीएसकड़ून  १०० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. एटीएसच्या विविध पथकांनी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हैदराबाद आणि नवी दिल्ली येथील यंत्रणांशी माहितीची देवाणघेवाण केली. दरम्यान, एटीएसने व्यावसायिक मनसुख हिरेन यांचे  शवविच्छेदन करणाऱ्या तीन तज्ज्ञांची चौकशी केली. प्राथमिक अहवालात मनसुख यांची हत्या करून त्यांचा मृतदेह खाडीत फेकण्यात आल्याचे सांगितले. अशात त्यावेळी फुफ्फुसात पाण्याचे प्रमाणही कमी असल्याचे नमूद करण्यात आले होते. मृत्यूपूर्वी 

मुंबई: मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मुंबई आणि ठाण्यातील दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे चौकशी केली. यातील एक अधिकारी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या आधी आणि नंतर सचिन वाझे यांच्यासोबत असल्याची माहिती समोर येत आहे.मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात आतापर्यंत एटीएसकड़ून  १०० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. एटीएसच्या विविध पथकांनी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हैदराबाद आणि नवी दिल्ली येथील यंत्रणांशी माहितीची देवाणघेवाण केली. दरम्यान, एटीएसने व्यावसायिक मनसुख हिरेन यांचे  शवविच्छेदन करणाऱ्या तीन तज्ज्ञांची चौकशी केली. प्राथमिक अहवालात मनसुख यांची हत्या करून त्यांचा मृतदेह खाडीत फेकण्यात आल्याचे सांगितले. अशात त्यावेळी फुफ्फुसात पाण्याचे प्रमाणही कमी असल्याचे नमूद करण्यात आले होते. मृत्यूपूर्वी मनसुख यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्याचे नमूद करण्यात आले होते.

पुढे एटीएसने डायटम चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल आणि शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या माहितीत विरोधाभास आढळून आला. मनसुख पाण्यात पडले तेव्हा ते जिवंत किंवा बेशुद्धावस्थेत होते, अशी माहिती यातून समोर आली. हा अहवाल एटीएस हरियाणा येथील प्रयोगशाळेत अभिप्रायासाठी पाठवणार आहे. त्यानुसार, त्यांचा अभिप्राय येताच पुढील भूमिका घेण्यात येणार असल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

    - आतापर्यंतच्या तपासात ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ११चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यामुळे दोघांकडे चौकशी करण्यात आली. त्यांचा यात काही सहभाग आहे का? या दिशेनेही चौकशी करण्यात आली. 

- यापैकी एक अधिकारी ३ ते ५ मार्च दरम्यान गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्षात (सीआययू) असल्याचे समजते. त्याबाबतही यावेळी चौकशी करण्यात आली. याच काळात ४ मार्च रोजी मनसुख कांदिवली कक्षाच्या तावडे नावाच्या व्यक्तिला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. - त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. कुटुंबीयांनी त्यांची बरीच शाेधाशाेध करुनही ते सापडले नाहीत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक त्यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर तपासात हिरेन ज्यांना भेटायला गेलाे हाेते त्या कांदिवली कक्षात तावडे नावाचा अधिकारी नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांकड़ून देण्यात आले होते. त्यामुळे संबंधित अधिकारी येथे क़ाय करत होता?  त्यांचा यात काही सहभाग आहे का? याबाबतही चौकशी हाेईल. - याप्रकरणी आतापर्यंत दाेघांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत. गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते, असेही एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.  

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाPoliceपोलिसMukesh Ambaniमुकेश अंबानीMansukh Hirenमनसुख हिरणMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी