शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

मराठा आरक्षणावरून विधिमंडळात गदारोळ, तीनवेळा विधानसभा तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 4:58 AM

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाच्या विषयावरून प्रचंड गदारोळ झाला.

नागपूर : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाच्या विषयावरून प्रचंड गदारोळ झाला. विधानसभा तीनवेळा तहकूब झाली. विरोधी बाकावरील सदस्य आक्रमक होत वेलमध्ये उतरले. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात सर्व पक्षाच्या गटनेत्यांची बैठक झाली. शेवटी १६ टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आणि हा गोंधळ शांत झाला.मराठा आरक्षणावरून परळीला सगळे तरुण एकत्र आले आहेत. लेखी आश्वासन मिळेपर्यंत हटणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. आरक्षणावरून सरकार वेळकाढूपणा करत आहेत. सत्तेत येण्यापूर्वी आरक्षण देण्याची घोषणा केली होती आता मराठा समाजाच्या भावनेशी सरकार खेळत आहे असे आक्षेप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले. तर आषाढी दिवशी पंढरपुरात आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. लाखाचे मोर्चे निघाले तरी सरकार निर्णय घेत नाही. मराठा समाजासाठी सहा निर्णय घेतले मात्र त्याचा काही फायदा नाही. शांततेत मोर्चे काढले, पण आता तरुण चिडले आहेत असे राष्टÑवादीचे नेते अजित पवार म्हणाले.मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचे समर्थन आहे. मात्र मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचे काम काँग्रेस व राष्ट्रवादीने केले असा आरोप भाजपाचे नेते आ. आशिष शेलार यांनी केला. शिवसेनेचे आ. चंद्रदीप नरके यांनीदेखील जोरदार आक्षेप घेत सरकारने न्यायालयात आपली बाजू मांडावी अशी मागणी केली.विधानपरिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी परळीत ३० तासांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे, बीड जिल्ह्यात आणि राज्याच्या तालुक्या-तालुक्यात हे आंदोलन सुरू होत आहे, आंदोलनकर्ते हटायला तयार नाही. भाजपा सरकारने कूटनीती तंत्राचा वापर करून गुजरातमधील पटेलांचे, हरियाणातील जाटांचे आरक्षण संपवून टाकले, तोच प्रयोग मराठा आरक्षणाबाबत होतो. मागासवर्ग आयोगाचे काम कुठपर्यंत आले, किती दिवसात पूर्ण होणार आहे अशी विचारणा न्यायालयाला करावी लागत आहे याचा अर्थ सरकार वेळकाढूपणा करत आहे असेही मुंडे यावेळी म्हणाले. गुरुवारी विधानपरिषदेमध्ये यावर पुन्हा एकदा स्थगन प्रस्ताव दिला गेला. आम्ही बुधवारी मागणी केली होती की, बेरोजगारांची जी महाभरती केली जाणार आहे त्यामध्ये ७२ हजार भरती केली जाणार आहे. त्यामध्ये मराठा समाजाच्या १६ टक्के जागा बाजूला ठेवा आणि त्यानंतर भरती करा. त्याबाबतचे सकारात्मक उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र यामध्ये मोठ्या शंका निर्माण होत आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८