शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

बीडमध्ये विधानसभेला राष्ट्रवादीसमोर भोपळा फोडण्याचे आव्हान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 17:34 IST

दहा वर्षांपूर्वी बीडमध्ये राष्ट्रवादीचे सहापैकी पाच आमदार होते. २०१४ मध्ये केवळ जयदत्त क्षीरसागर यांच्या रुपाने एक जागा राष्ट्रवादीला जिंकता आली. परंतु, २०१९ येईपर्यंत क्षीरसागर देखील राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत सामील झाले. त्यामुळे शिवसेनेला बीडमध्ये संधी निर्माण झाली. तर राष्ट्रवादी शुन्यावर गेली.

मुंबई - एकेकाळी बीड जिल्ह्यातील सहापैकी पाच मतदारसंघांवर वर्चस्व राखणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था फारच बिकट झाली आहे. राष्ट्रवादीतील दिग्गज नेते गळाला लागल्याने भाजपने जिल्ह्यात मोठी ताकद निर्माण केली आहे. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातच प्रमुख लढत असताना जिल्ह्यात शिवसेनेची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच लढती लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात प्रभाव निर्माण केला. राष्ट्रवादीचे नेते रमेश अडसकर, सुरेश धस यांच्यासह इतर नेत्यांना पक्षात घेऊन पक्षाला मजबूत केले. परळी नगर परिषद वगळता जिल्ह्यात सर्व ठिकाणी पंकजा यांनी भाजपला वर्चस्व मिळवून दिलं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही प्रितम मुंडे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. या निकालावरून विधानसभेला भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीला खडतर परिश्रम करावे लागणार आहेत.

दहा वर्षांपूर्वी बीडमध्ये राष्ट्रवादीचे सहापैकी पाच आमदार होते. २०१४ मध्ये केवळ जयदत्त क्षीरसागर यांच्या रुपाने एक जागा राष्ट्रवादीला जिंकता आली. परंतु, २०१९ येईपर्यंत क्षीरसागर देखील राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत सामील झाले. त्यामुळे शिवसेनेला बीडमध्ये संधी निर्माण झाली. तर राष्ट्रवादी शुन्यावर गेली. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीसमोर सर्वात महत्त्वाचे म्हणजे भोपळा फोडण्याचे आव्हान आहे. त्यानंतर इतर मतदारसंघातील विजयावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.

परळीतून राष्ट्रवादीला सर्वाधिक आशा

सध्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही विधानसभा आमदार राहिला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्तेही निराश झाले आहेत. परंतु, विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडून पक्षाला मोठ्या अपेक्षा आहे. धनंजय मुंडे परळीतून निवडणूक लढविणार हे निश्चित असून त्यांची लढत बहिण पंकाज मुंडे यांच्याशी होणार आहे. लोकसभेला परळीतून भाजपला २० हजारांचे मताधिक्य आहे. अशा परिस्थितीत धनंजय मुंडे यांच्यासमोरही ही जागा जिंकण्याचे आव्हान आहे. ही जागा आपणच जिंकू अशी आशा राष्ट्रवादीला आहे.