शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बीडमध्ये विधानसभेला राष्ट्रवादीसमोर भोपळा फोडण्याचे आव्हान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 17:34 IST

दहा वर्षांपूर्वी बीडमध्ये राष्ट्रवादीचे सहापैकी पाच आमदार होते. २०१४ मध्ये केवळ जयदत्त क्षीरसागर यांच्या रुपाने एक जागा राष्ट्रवादीला जिंकता आली. परंतु, २०१९ येईपर्यंत क्षीरसागर देखील राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत सामील झाले. त्यामुळे शिवसेनेला बीडमध्ये संधी निर्माण झाली. तर राष्ट्रवादी शुन्यावर गेली.

मुंबई - एकेकाळी बीड जिल्ह्यातील सहापैकी पाच मतदारसंघांवर वर्चस्व राखणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था फारच बिकट झाली आहे. राष्ट्रवादीतील दिग्गज नेते गळाला लागल्याने भाजपने जिल्ह्यात मोठी ताकद निर्माण केली आहे. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातच प्रमुख लढत असताना जिल्ह्यात शिवसेनेची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच लढती लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात प्रभाव निर्माण केला. राष्ट्रवादीचे नेते रमेश अडसकर, सुरेश धस यांच्यासह इतर नेत्यांना पक्षात घेऊन पक्षाला मजबूत केले. परळी नगर परिषद वगळता जिल्ह्यात सर्व ठिकाणी पंकजा यांनी भाजपला वर्चस्व मिळवून दिलं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही प्रितम मुंडे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. या निकालावरून विधानसभेला भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीला खडतर परिश्रम करावे लागणार आहेत.

दहा वर्षांपूर्वी बीडमध्ये राष्ट्रवादीचे सहापैकी पाच आमदार होते. २०१४ मध्ये केवळ जयदत्त क्षीरसागर यांच्या रुपाने एक जागा राष्ट्रवादीला जिंकता आली. परंतु, २०१९ येईपर्यंत क्षीरसागर देखील राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत सामील झाले. त्यामुळे शिवसेनेला बीडमध्ये संधी निर्माण झाली. तर राष्ट्रवादी शुन्यावर गेली. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीसमोर सर्वात महत्त्वाचे म्हणजे भोपळा फोडण्याचे आव्हान आहे. त्यानंतर इतर मतदारसंघातील विजयावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.

परळीतून राष्ट्रवादीला सर्वाधिक आशा

सध्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही विधानसभा आमदार राहिला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्तेही निराश झाले आहेत. परंतु, विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडून पक्षाला मोठ्या अपेक्षा आहे. धनंजय मुंडे परळीतून निवडणूक लढविणार हे निश्चित असून त्यांची लढत बहिण पंकाज मुंडे यांच्याशी होणार आहे. लोकसभेला परळीतून भाजपला २० हजारांचे मताधिक्य आहे. अशा परिस्थितीत धनंजय मुंडे यांच्यासमोरही ही जागा जिंकण्याचे आव्हान आहे. ही जागा आपणच जिंकू अशी आशा राष्ट्रवादीला आहे.