शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Vidhan Sabha 2019 : ...तर वंचितसोबत पुन्हा आघाडी शक्य; एमआयएमचा सूर बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 18:23 IST

: जागावाटपात तडजोड झाल्यास एमआयएम आघाडी करण्यास तयार

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची आघाडी होण्याची शक्यता आहे. जागांची तडजोड केल्यास आघाडी होऊ शकते, असं विधान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. माझ्या हातून काही चूक झाली असेल, तर त्यासाठी मी प्रकाश आंबेडकर यांची माफी मागायला तयार असल्याचंदेखील ते म्हणाले. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही वंचित आणि एमआयएमची आघाडी होऊ शकते.जागावाटपात सन्मान राखला जात नसल्यानं आघाडीमधून बाहेर पडत असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. यानंतर जलील आणि वंचित बहुजन आघाडीत वाकयुद्ध रंगलं होतं. मात्र आता हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हं आहेत. जागावाटपात तडजोड झाल्यास आघाडी शक्य असल्याचं जलील यांनी म्हटलं आहे.  एमआयएमला सन्मानजनक जागा मिळाल्यास वंचितसोबत आघाडी होईल, असं म्हणत त्यांनी मनोमिलनाचे संकेत दिले.प्रकाश आंबेडकर आमचे मोठे बंधू आहेत. त्यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना फोन करुन संवाद साधावा, असं म्हणत जलील यांनी आंबेडकरांची माफी मागण्याचीदेखील तयारी दर्शवली. माझ्याकडून काय चूक झाली याची मला कल्पना नाही. मात्र अनावधानानं माझ्या हातून काही चुकीचं घडलं असेल, तर त्यासाठी मी आंबेडकरांची क्षमा मागण्यास तयार आहे. कारण मी त्यांचा आदर करतो, असंदेखील जलील म्हणाले.जलील यांनी आघाडी मोडल्याची घोषणा केल्यानंतर वंचितच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे जलील आणि वंचित यांच्यात वाद पेटला होता. या वादावर भाष्य करताना आंबेडकर यांनी आम्ही थेट ओवेसींशी बोलतो, असं म्हणत जलील यांना अनुल्लेखानं मारलं होतं. विशेष म्हणजे यावर ओवेसी यांनी जलील यांचाच शब्द महाराष्ट्रात अंतिम असेल, असं म्हणत आघाडी मोडल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं होतं.  

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीImtiaz Jalilइम्तियाज जलील